जुगारामुळे देशातील अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत असून, दररोज शेकडो तरुण आर्थिकदृष्ट्या खंगत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेशराव ननवरे (रा. सोलापूर, सध्या पुणेस्थित) यांनी ऑनलाईन जुगारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असून, संबंधित बाबींवर न्यायालय गांभीर्याने विचार करत आहे. गणेश ननवरे यांनी त्यांच्या टीमसह देशातील विविध भागांतील ऑनलाईन गेमिंग अॅप्समुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांची माहिती संकलित करून उच्च न्यायालयात सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दररोज जवळपास ३० ते ४० तरुण आत्महत्या करत आहेत,
ही अत्यंत गंभीर बाब आहे.या याचिकेच्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना लेखी निवेदन सादर करून सखोल माहिती दिली आहे. त्याचबरोबर अधिवेशनातही हा मुद्दा गाजत असून, गेमिंग अॅप्सच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही गेमिंग कंपन्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल झाल्या असून त्यावर निर्णय प्रक्रिया सुरू आहे. गणेश ननवरे यांच्या मते, ऑनलाईन गेमिंगचे व्यसन हे नव्या पिढीच्या भविष्यावर अंधार पसरवत असून, याबाबत तातडीने आणि ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ननवरे यांनी प्रजासत्ताक जनताशी बोलतांना स्पष्ट केले.मोबाइल फोनवर टाइमपास करण्यासाठी बऱ्याचदा लोक गेम खेळतात. परंतु फोनमध्ये गेम खेळून कमाई करण्याचे वेड हल्ली तरुण पिढीला अधिक आकर्षित करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील तरुणाई ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात असल्याचं दिसून येत आहे. भारतात ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तरीही युजर्ससाठी हानिकारक असलेल्या आणि व्यसन लागण्याची शक्यता असलेल्या या ऑनलाईन गेम्स सुरूच आहे परिमामी युवापिढी बर्बाद होत आहे. अल्पवयीन तरुणांना याचे व्यसन लागले असून इस्टन्ट पैशाच्या अमिशापोटी अनेक तरुण ऑनलाइन गेमिंग अॅप द्वारे मटका सारखा जुगार खेळत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरीकांना पडला आहे.

0 टिप्पण्या