ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (IAS) यांनी एक गौरवशाली कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल CREDAI MCHI ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी, मानद सचिव फैयाज विराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी ३१ जुलै रोजी त्यांचा सत्कार केला. , आज ३१ जुलै २०२५ रोजी शिनगारे आपल्या सेवेतू निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी ठाणे हे त्यांचे शेवटचे पोस्टिंग होते. ठाणे शहराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी, विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात, अमूल्य सहकार्य आणि योगदानाबद्दल, निवृत्त ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (IAS) यांचे सचिन मिराणी यांनी मनापासून आभार मानले.
त्यांच्या जिल्हाधिकारीपदाच्या कार्यकाळात, त्यांनी ठाण्यात रिअल इस्टेट विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात, प्रकल्पांची सुरळीत अंमलबजावणी सुलभ करण्यात आणि वेळेवर मंजुरी सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि प्रदेशाच्या प्रगतीसाठीची वचनबद्धता ठाण्याच्या विकासाच्या कथेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, ठाण्याच्या विकासाच्या मार्गाला आणखी चालना देण्यासाठी क्रेडाई एमसीएचआय ठाणे सरकारी अधिकाऱ्यांसोबत सहयोगी प्रयत्न सुरू ठेवण्यास नेहमीच तत्पर असल्याचे मत मिराणी यांनी व्यक्त केले. "जिल्हाधिकारी असताना ठाणे हे गुंतवणूक आणि विकासाचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रसिध्द करण्यासाठी अशोक शिनगारे यांनी केलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. या प्रदेशाच्या आणि येथील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले समर्पण कौतुकास्पद आहे," असे क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे मानद सचिव फैयाज विराणी म्हणाले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आज आपल्या कार्याचा पदभार स्विकारला. डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016 Batch चे IAS अधिकारी आहेत. Native of Udgir Dist Latur. शिक्षण- MBBS, Govt Grant medical college & Sir JJ group of hospitals, Mumbai.
यवतमाळ येथील कालावधीदरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदेस सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बाल विकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. कोवीड काळात मिशन कायाकल्प राबवून RH, PHC, Sub centre मध्ये सुधारणा केली. तद्नंतर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधून संवेदनशीलपणे आंदोलनाचा कालावधी हाताळला. CM 100 days program मध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती. तसेच, जालना जिल्ह्यामध्ये रेशीम, Agro processing, skill development क्षेत्रांत भरीव काम केले आहे.आता त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.


0 टिप्पण्या