Top Post Ad

मी तुमचा नोकर राहू इच्छितो....


 सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले असे राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले.  भारत जोडो यात्रेदरम्यानची राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला येथे पार पडली.  आपले मत अधिक स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला.  या माफीनाम्यातील शेवटची ओळ वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घाबरल्यामुळे इंग्रजांना माफीनामा लिहला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्ष तुरुंगात डांबले होते. पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. कोणताही माफीनाम्याची कोणतीही चिठ्ठी लिहली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

 हा या दोन विचारधारेतील फरक आहे. एक गांधींची विचारधारा तर दुसरी सावरकरांची असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मागील काही दिवसापासून वि.दा.सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सावकरांच्या माफीनाफ्यावरून खुल्या चर्चेचे आव्हान देत सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफी मागितल्याचे पत्रच जाहिर करून टाकले. 

राहुल गांधी यांनी ४० मिनिटे पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे, कपिल ढोके, डॅा. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.

देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला व यातून मला खूप काही शिकायला मिळाले. महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा येथेच राहण्याचा विचार का केला असावा? याचे उत्तर मला या विदर्भाच्या भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

................................................................

हे पण् वाचा..... वि.दा.सावरकर
------------------------------------------------
सावरकरांवर टीका करणारे लोक खालील प्रश्न सतत विचारत असतात.
सावरकर प्रेमी अभ्यासकांनी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना चूक ठरवावे.

  • १) सावरकरांना "स्वातंत्र्यवीर/ वीर" ही पदवी पहिल्यांदा कुणी व कधी दिली?
  • २) सावरकर बॅरिस्टर असूनही त्यांनी वकिली का केली नाही? त्यांनी विकीलीची परीक्षा कधी पास केली? व त्यांना विकिलीची सनद कधी मिळाली? सनद मिळाली नसेल तर ती का?
  • ३) सावरकरांना ब्रिटन मध्ये अटक का झाली होती व त्यात तीन महिन्याची शिक्षा सुद्धा झाली होती, ती का?
  • ४) सावरकरांना इंग्रज सरकार कडून महिना ६० रू. पेन्शन मिळत होती की नाही?
  • ५) ते वीर होते तर त्यांनी इंग्रजांना ६-६ माफीनामे लिहून का दिले?
  • ६) इंग्रज राजवटीला गुंगारा देण्यासाठी त्यांनी माफीनामे दिले असतील तर सुटून आल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याची उदाहरणे का नाहीत?
  • ७) स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला काँग्रेस, पटेल, नेहरू देशातील सर्व रियासती एक करून एकसंघ भारत उभा करण्यासाठी झटत असताना सावरकरांनी काही रियासतींना "तुम्ही भारतात विलीन होउ नका" म्हणून पत्रे लिहून का उकसवत होते? ही कोणती देशभक्ती?
  • ८) जिनांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी करण्या पूर्वीच सावरकरांनी द्वीराष्ट्राची संकल्पना २० एक वर्षांपूर्वी त्यांच्या पुस्तकात मांडली होती की नाही?
  • ९) पर धर्मातील स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांना सावरकरांनी "सद्गुण विकृती" म्हणणे तुम्हाला योग्य वाटते का?
  • १०) मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करण्याचं आवाहन करणारा माणूस आदर्श असू शकतो काय?
  • ११) अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा केवळ सावरकरांनाच झाली होती काय? कोलू ओढण्याचं काम फक्त त्यांनाच दिलं होतं काय? 
  • १२) इतर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी इंग्रजांची माफी न मागता तिथेच स्वाभिमानाने मृत्यूला सामोरे गेले असे हजारावर शहीद वीर सावरकरांपेक्षा जास्त देशभक्त आणि साहसी वीर नव्हते काय? त्यांची नावे तरी देशातील जनतेला माहीत आहेत का?

                          Vedant Chitre यांची पोस्ट,

                          ----------------------------------------

                           मराठीत सावरकरांवर अनेक लेखकांनी संशोधन अंती लेखन केलेली पुस्तके उपलब्ध असतांना त्यातील तथ्य लपविण्याची चलाखी करीत रेटून खोटे बोलणे ही एका वर्गाची पारंपारीक रितच झाली आहे. या संदर्भात आर्काईव्हज( अभिलेखागार) मधील रेकार्ड्सच्या आधारे खालील प्रश्न विचारीत आहोत त्याची उत्तरे चाणाक्ष वाचकांनी जरूर शोधावी. 

                          ( 1 ) भाषेवर प्रभुत्व असल्याचा फायदा घेत सावरकरांनी स्वतःच स्वतःला "स्वातंत्र्यवीर सावरकर" ही उपाधी  लावली हे खरं नाही का ? 

                          ( 2 )  ने मजसी ने परत मातृभूमीला " या गीताचे अंदमान जेलशी काहीही संबंध नाही. मोठेभाऊ बाबाराव सावरकर यांचा मुलगा प्रभाकर वारला तेंव्हा 1906 मध्ये लंंडनहून शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी वहिनीला विरहगीत म्हणून लिहून पाठविल्याची नोंद आहे कि नाही ? 

                          (3) नाशिक मध्ये कलेक्टर जॅक्सनचा झालेल्या खुनाच्या संबंधात लंडन मध्ये सावरकरांना अटक करून एस. एस.मोरीया या बोटीने भारतात आणत असतांना फ्रांसच्या मार्सेलस बंदरावर उभ्या बोटीतून त्यांनी उडी मारली आणि समुद्रात ते फक्त 07 मिनिट होते. लगेचच किनार्यावर त्यांना अटक झाली. खवळलेल्या समुद्रात त्यांनी उडी मारली असा जो प्रचार केला जातो तो खोटा आहे कि नाही ?

                          ( 4 ) 04 जुलाई 1911 रोजी सेल्युलर जेल अंदमान येथे त्यांना नेण्यात आले तेंव्हा जेल मॅन्युअल प्रमाणे त्यांचे वजन 112 पाउंड  होते तर 14 नोव्हेंबर 1914 रोजी होम सेक्रेटरी क्रॅडाकला भेटून तिसरा माफीनामा दिला तेंव्हा त्यांचे वजन 126 पाउंड होते अशी नोंद जेल मॅन्युअल मध्ये आहे कि नाही ?

                          ( 5 ) अंदमानच्या जेल मध्ये पहिले सहा महिने प्रत्येकाला एकांतवासाची शिक्षा असायची, कैद्यांना तेंव्हा कोणते ही काम दिले जात नसत.सावरकरांना दोरी वळण्याचे काम प्रस्तावित होते. 4 जुलाई 1911 ला जेलमध्ये गेलेल्या सावरकरांनी 29 ऑगस्ट 1911ला पहिले दया याचना करणारे पत्र लिहिले होते कि नाही ?

                          ( 6 ) दया याचना करण्यासाठी सावरकरांनी स्वतः 06 पत्रे, त्यांच्या भावानी 03, वहिनींना 03 आणि पत्नीने 03 अशी त्यांनी किंवा त्यांच्या वतीने 15 माफीनामा ब्रिटिश सरकारला लिहिली गेली कि नाही ?

                          ( 7 ) माफीनाम्यात  "हा वाट भरकटलेला मुलगा "  दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारा मधे भीक मागणार नाही तर कुठे मागेल? तुमचा आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. मी आणि माझा भाऊ आपले उर्वरित आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहे . ( मराठीत अनुवादित)  अशी भाषा माफीनाम्यात सावरकरांनी वापरली आहे कि नाही ?

                          ( 8 ) येरवडाच्या तुरूंगातून 1924 मध्ये सुटका झाल्यावर मुंबई  येथे वाईसराय लिनलिथगो यांच्याशी लेखी  ( एम ओ यू ) करार केला.त्या करारपत्राच्या पहिल्या वाक्यात ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदु महासभेच्या समान उदिष्टांच्या पूर्तीसाठी मी माझे उर्वरित आयुष्य कांग्रेस, गांधी आणि मुसलमानांचा विरोध करीन असे सावरकरांनी लिहून दिले कि नाही ? ( to fullfil the common objective of British Empire and Hindu mahasabha I assured to spend my life in opposing Congress, Gandhi and Muslims.)

                          ( 9 ) हा करार केल्यानंतर ब्रिटिश सरकार ने त्यांना रत्नागिरीत राहायला बंगला आणि महिना 60 रू. पेंशन दिली ही वस्तुस्थिती आहे कि नाही ? 

                          ( 10 ) हिंदु महासभेनी  रिक्रूटमेंट बोर्ड स्थापन करून अंग्रेजांच्या सैन्यात तरूणांनी भरती व्हावे असे ,कांग्रेसचा याला विरोध असतांना ही, देशभरात अभियान राबविले. सेंट्रल मिलिटरी रिक्रूटमेंट बोर्डावर  लहान भावाची नियुक्ती केल्या बद्दल सावरकरांनी ब्रिटिश सरकारला धन्यवादाचे पत्र लिहिले कि नाही ? 

                          ( 11 ) बलात्कार एक राजकीय हत्यार असल्याची मांडणी त्यांनी आपल्या पुस्तकात ( सात सोनेरी पाने ) केली आहे की नाही ? ( Rape is a Political Weapon and it should be used against your Political Opponents)

                          ( 12 ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी स्थापित कपूर आयोगा समोर अप्पा कासार (सावरकरांचा अंगरक्षक) आणि सचिव गजानन विष्णू दामले यांनी गांधी हत्येचा संपूर्ण कट सावरकरांच्या निवासस्थानीच रचला गेला अशी साक्ष नोंदविली आहे कि नाही ?

                          ( न्यायालयात वेळेत हा पुरावा सादर झाला नाही म्हणून संशयाचे फायदा घेऊन सावरकरांची  सुटका झाली )

                          टिप :- इतिहास कृतघ्न नसतो  तुम्ही डोळे झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो नोंदी घेत असतो याची कृपया नोंद घ्यावी.

                          टिप्पणी पोस्ट करा

                          0 टिप्पण्या

                           READ / SHARE  / FORWARD 
                          JANATA  NEWS  xPRESS

                          निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
                          for Donation
                          G pay 8108603260 

                          संपादक: सुबोध शाक्यरत्न  
                          M : 8108658970

                          Email- pr.janata@gmail.com