Top Post Ad

खड्डे प्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या त्या चार अभियंत्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव तयार

ठाणे: खड्ड्यातील रस्त्यांमुळे मागील महिनाभर ठाणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अद्यापही जैसे थी अवस्था असली तरी याबाबत ठाणे महानगर पालिकेवर टीका झाली. याची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ चार अभियत्यांना निलंबित केले होते. मात्र ज्यांच्या क्षेत्रात खड्डे नव्हते त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे कारण देत आता या निलंबित अभियंत्यांना सेवेत बहाल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.  पालिका प्रशासनाच्या वतीने, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, या संदर्भात चार अभियंत्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि तो लवकरच आयुक्तांकडे पाठवला जाईल.


शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी त्यांच्या परिसरातील रस्त्यांवर खड्डे नसतानाही अभियंत्याच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला आणि या मनमानी पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाबाबत, भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की त्यांच्या भागातही रस्त्यावर खड्डे नाहीत. शहराच्या अंतर्गत रस्त्यांपेक्षा एमएमआरडीसी, एमएमआरडीए आणि महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर जास्त खड्डे आहेत.  
परंतु या विभागांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी केवळ पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून पालिका प्रशासनाने स्वतःच्या अधिकाऱ्यांचा बळी दिला. 

राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला आणि शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनीही कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आणि एमएसआरडीसी, एमएमआरडी आणि मेट्रोला जबाबदार धरून कारवाईची मागणी केली आणि चारही निलंबित अभियंत्यांना पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आयुक्तांशी बोलून सर्वांना पुन्हा सेवेत ठेवण्याचे आश्वासन दिले.

सभागृहाला माहिती देताना मनपा अभियंता अहिरे म्हणाले की, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक भेटीदरम्यान त्यांनी केवळ पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या रस्त्यांची पाहणी केली होती. पण वरिष्ठांनी विचारल्यावर त्यांनी अशी माहिती दिली. परंतु, असे असूनही, त्याच्याकडून अभियंत्यांची नावे विचारण्यात आली. म्हणून त्यांनी नाव दिले आणि माझ्यामुळे अभियंत्यांवर कारवाई झाली नाही. असा बचाव करताना त्यांनी स्वतःचा बचाव केला आणि दोष प्रशासनावर टाकला. दुसरीकडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी म्हणाले की, सर्व्हिस रोडवर खड्डे होते आणि त्या काळात परिस्थितीच्या आधारे संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. अशा तऱ्हेने नगरसेवकांनी लावलेल्या आरोपांदरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि महानगरपालिकेचे अभियंता अर्जुन अहिरे यांच्यात समन्वयाचा अभाव होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com