आशा त गटप्रवर्तक कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितींमध्ये काम करीत आहेत. त्या दररोज सात ते आठ तास काम करत्तात. त्यांना अत्यंत कमी वेतनावर राबवून घेतलें जाते. त्यांना जगण्यासाठी किमान वेतन द्यावे, कोरोना संबंधित कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ द्यावी. कोरोना संबंधित काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता सर्व राज्यभर आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना चावा. आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी व गल्प्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करावे. इत्यादी मागण्या यावेव्ठी कृती समितीने आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या,
तर राजेश टोपे यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून आता कोणताही आर्थिक बोजा सहन करण्याची सरकारची परिस्थिती नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे शक्य नाही व कोरोना संबंधित मोबदल्यात वाढ करणे शक्य नसल्याचे सांगत स्पष्ठ केल्याची माहिती कृती समितींच्या वतीने सांगण्यात आले. तसेच संप मिटवण्याकरता कोणताही प्रस्ताव त्यांनी कृती समितीच्या नेत्यांसमोर मांडला नाही, त्यामुळे वरील मागण्यांसाठी बेमुदत संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृतीं समितीने घेतल्याची माहिती डॉ.डि.एल.कराड यांनी दिली.
0 टिप्पण्या