Top Post Ad

सरपंच निवडणूक ग्रामपंचायतीतुनच ; 

सरपंच निवडणूक ग्रामपंचायतीतुनच ; 
राज्यपालांच्या नकारानंतर विधयेक मंजूर !



मुंबई
ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक थेट लोकांमधून न करता ग्रामपंचायत सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यासंदर्भातला अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करून पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणेच निवडणुका होतील, असं जाहीर केलं होतं. मात्र, त्या सगळ्यावर राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारने मात केली असून त्यासंदर्भातलं सरपंच थेट निवडणूक बिल राज्यसरकारने विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर केलं आहे. या विधेयकानुसार आता ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक थेट लोकांमधून न होता ग्रामपंचायत सदस्यांकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे हा विरोधी पक्षांत असलेल्या भाजपसोबतच राज्यपालांना देखील दणका मानला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com