Top Post Ad

तर पुढल्या पिढीचे भविष्य अंधःकारमय होईल ...वेणू नायर

 खरे तर  कोणत्याही देशाच्या देशोन्नतीचा कणा हा कामगार आहे..त्याच्या जीवावर कारखानदारी  सह   उद्यामशीलता जिवंत राहून  आणि जगाचा कारभार चालतो . विकासाला चालना मिळते. पण आज हाच कामगार देशोधडीला लागला आहे..रोज नवनवीन प्रयोग आणि  बदलते कामगार कायदे आणि त्याविषयीची धोरणं.यामुळे  कामगार  क्षेत्रात नैराश्य आले आहे. कामगार जगला पाहिजे.कामगार जगला तर देश जगेल त्यासाठी येणाऱ्या नवी पिढीला याची खात्री करून देणं  गरजेचे आहे.असे सडेतोड भाष्य  रेल  कामगारांचे नेते कॉ.वेणू नायर यांनी केले आहे.

 


जागतिक कामगार दिनानिमित्त रेल्वे कामगारांना  संबोधित करताना त्यांनी वरील विचार मांडले .नव्या  पिढीचे नव्या दमाच्या कामगारांनी कामगार क्रांतीचा इतिहास  समजून घेण्याची आवश्यकता आहे.तरच ह्या जीवघेण्या स्पर्धेत तो टिकेल  आणि त्याचे कुटुंबीय तग धरू शकेल  असे सांगून  मार्गदर्शन करताना कॉ . नायर  पुढे म्हणाले, हे सरकार बेभरवशाचे आहे .कधी काय निर्णय घेईल .?आणि कधी काय घडेल ? त्याचा नेम नाही .त्यासाठी  कामगारांनी जागरूक राहणे आवश्यक आहे असे ही नायर यांनी सांगितले.

कल्याण रेल्वे इन्स्टिट्यूट येथील सभागृहात  नॅशनल रेल्वे  मजदुर युनियन तर्फे  १ मे महाराष्ट्र दिन  आणि जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला .त्यावेळी  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते .  कॉ.पी जी शिंदे ,  बाळा गंगू, कॉ .आर के मलबारी ,विनय  सावंत  , हर्षा शेळके ,के आर गोयल आदी पदाधिकारी आणि रेल कामगार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून  कॉ.नीलकंठ  वाघमारे,आणि हर्षला कैलास ढगळे  यांनी सांस्कृतिक परंपरा सांगणारा कार्यक्रम सादर केला .शेवटी  कॉ.का आर.होईल यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com