तुम्ही अजित पवार यांच्यासोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येणार का? यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्याबाबत स्पष्ट करताना ते म्हणाले, आमच्या पक्षात दोन विचारधारेचे आणि दोन प्रकारच्या मतप्रवाहाचे गट आहेत. त्यातील एक विचारधारा असे सांगते की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपण भारतीय जनता पक्षासोबत जाता कामा नये. तर दुसरा मतप्रवाहाचा गट म्हणतोय की, आपण अजित पवार गट किंवा भाजपासोबत गेलं पाहिजे.
परंतु मला वाटतं की, सध्या इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट अधिक मजबूत केली पाहिजे. भाजपासोबत लढण्यासाठी विरोधकांनी पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे आणि लढलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले. तसेच सध्या इंडिया आघाडी शांत असली तरी तिची पुनर्बांधणी केली पाहिजे. एकत्र मिळून काम केलं पाहिजे. आमच्या पक्षाची विचारधारा आहे की, विरोध पक्षातच राहून काम करायचं. दरम्यान, संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनाच घ्यायचा आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवारांच्या या वक्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकाच रक्तातील नाते एकत्र येत असतील आणि महाराष्ट्राचा विकास होत असेल... महाराष्ट्र जर पुढे जात असेल तर भाजपाला यावर काही आक्षेप असण्याचं कारण नाही. उलट ते एका रक्ताची नाती आहेत. बहीण-भाऊ आहेत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी एकत्र आलं तर महाराष्ट्रासाठी ते हिताचं आहे. पण शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला याच्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, - भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार
"शरद पवार हे देशाचं मोठं नेतृत्व आहे. त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्व करणार आहेत, त्यांनी जेव्हा असा एकत्र येण्याचा प्रस्ताव घेऊन येईत, तेव्हा अजित पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ यावर योग्य तो नेते निर्णय घेतील", राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे
0 टिप्पण्या