महाराष्ट्रातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपुन चार पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार राज्य सरकारद्वारे होत आहे या याबाबत अनेक संस्था संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र त्यावर अद्याप निर्णय होत नव्हता. डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्यकांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ४ महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिले. यामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील. निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, अशी माहिती राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला दिली. त्यावर सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा, तसेच पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिल्याने राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
- सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? -
- स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्या नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या
- 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या
- राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी
- ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले
- सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश.
- पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा
- 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील.
- निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती.
- राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा.
0 टिप्पण्या