Top Post Ad

मुंबईवर सरकारी जलात्कार...! कुठं नोंदवायचा एफआयआर ?

26 मे 2025 !... 26 जुलै 2005 नाही. 26 जुलै सारखा दिवसरात्र तुफान पाऊस पडला असता तर समजण्या सारखं होतं.पण 26 मे रोजी नुसत्या मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली. मिडिया जे सांगतोय विक्रमी पाऊस, तो दुपारनंतर.पण मुंबई तर सकाळीच बरबाद झाली. नव्हे ती केली गेली. मुंबईवर पावसाने नव्हे तर सरकारनेच जलात्कार केला आहे. मुंबईतील नाले सफाईची लाखो करोडोंची कंत्राटे कुठल्या पाण्यात वाहून गेली ? एप्रिल मे मधील नालेसफाईच्या सरकारी पाहणीचे रंगीबेरंगी फोटो कुठल्या रद्दीत दाबले गेले. टेंडर्सचा पाण्यासारखा पैसा कोण्या सरकारी बंगल्याच्या टॉयलेट मध्ये गडप झाला ? कोण देणार याची उत्तरं ? मुंबईवर गेली अनेक वर्षं आयुक्त राज आहे. तिच परिस्थिती राज्यातील अनेक शहरांची. पण आयुक्तांच्या मागे उभे राहून कोण राज्य करतंय या शहरांवर ? मंत्री, पालकमंत्री, तिथले आमदार, खासदार यांनी या शहरांना वाचवण्यासाठी काय केलंय? पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरे तुंबणार हे त्यांना माहीतच नव्हते का ? की पहिल्यांदाच त्यांनी मुसळधार पाऊस बघितलाय ? मुंबई, ठाणे, पालघर परिसरात दरवर्षी होणारी जनतेची पाऊसकोंडी नवीन आहे की काय ?

तरीही नेमीची येतो पावसाळा सारखी दरवर्षी तीच परिस्थिती कशी काय उद्भभवते ? दरवर्षी तेच ते मिलन सब वे, कुर्ला कालीना, खार, वांद्रे, लालबाग, परळ , सायन, धारावी कसे काय पाण्यात जातात ? यंदा तर नवीनच बांधलेले वरळीतील अंडर ग्राउंड रेल्वे स्टेशनही पाण्याखाली गेलंय. आता काय अख्खी मुंबई पाण्याखाली जाण्याची वाट बघतंय सरकार ? मुंबईची वाहतूक कोलमडल्या बरोबर सगळे मंत्री मुंबई ठाण्याच्या कंट्रोल रूम मध्ये धावून धावून आढावा घ्यायला लागले. पाऊस अनपेक्षितपणे लवकर आल्याची थातूरमातूर कारणं देऊ लागले. विक्रमी पाऊस झाल्याच्या गप्पा हाणू लागले. जणू काही जून जुलै मध्ये पाऊस आला तर मुंबई थांबणारच नाही. रेल्वेला तर बोलायलाच नको. दरवर्षीचा हा राडा त्यांना दिसतच नसावा. त्यांना फक्त मुंबईकरांच्या खिशातला पैसा फक्त दिसत असावा. रेल्वे मंत्री सोडा,साधा अधिकारीही समोर येऊन बोलायला तयार नसतो. आताही कोणी आलं नाही. सगळ्या सरकारी यंत्रणा आणि त्यांच्या आकांनी मुंबईला उध्वस्त करून हात झटकलेत. लोकंही एक दिवस चिडतात. गोर गरीब,मध्यम वर्गाच्या हाल अपेष्टांवर हळहळ व्यक्त करतात आणि निमूटपणे आपल्या कामाला लागतात.
अशा परिस्थिती कोण न्याय देणार मुंबईला ? कुठं नोंदवायचा हा एफ आय आर ?
---- रवि भिलाणे
-------------------------------------------

मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या १० वर्षात ₹२.१९ लाख कोटी (₹२,१९,०००,०००,०००). रुपये वाटप केले. BMC चा २०२५-२६ चा वार्षिक अर्थसंकल्प इतिहासातील सर्वाधिक - ₹७४,४२७ कोटी, रुपये आहे. हे सर्व पैसे आणि तरीही मुंबई पाण्याखाली आहे! हा गोंधळ अनेक दशकांपासून चाललेल्या भ्रष्टाचाराचा आणि BMC ने केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा परिणाम आहे! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस - हे सर्वच गेल्या काही वर्षांच्या भ्रष्टाचारासाठी आणि मुंबईच्या सध्याच्या स्थितीसाठी जबाबदार आहेत. मुंबईच्या अॅक्वा लाईन (मेट्रो लाईन-३) वरील वरळी भुयारी मेट्रो स्टेशन जे पाण्याखाली गेले, या मेट्रो स्टेशनचे नुकतेच उद्घाटन झालेले होते. हे दृश्य पाहून राज्यात भ्रष्टाचार किती मोठा असेल याची कल्पना करता येते. महाराष्ट्रातील नागरिकांनो, जागे व्हा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com