महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती व सनातन धम्म यांच्या वतीने मंगळवार दि ६ मे व बुधवार दि ७ मे २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत तक्षशिला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल, सुभाष टेकडी, उल्हासनगर- ४ जिल्हा ठाणे दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले गेलेले आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. एन. आनंद महाथेरो (संस्थापक-महामहीद इंटरनॅशनल धम्मदुत सोसावटी) यांच्या शुभहस्ते होणार असून बौद्ध साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रताप चाटसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तर महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संयोजक तथा सनातन धम्मचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. डॉ. विलास खरात हे या शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. महामंहिद इंटरनॅशनल धम्मदुत सोसायटी, संघमित्रा वंदना संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोर्स, जागृती विचार मंच. आदी संस्था, मंडळे व संघटना यामध्ये सहभागी आहेत. या दोन दिवसीय बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिरास तमाम बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९३५ ला नाशिकच्या येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर पुढची २१ वर्ष जनजागृतीचे निरंतर काम केले आणि १४ ऑक्टोबर १९५६, ला अशोका विजयादशमी दिनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलन काठमांडू नेपाळ येथे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध राष्ट्रांच्या प्रतिनिधी समोर महत्वपुर्ण वक्तव्य दिले ज्यामध्ये ते म्हणाले होते की, केवळ दोन वर्षाच्या आत मी भारत बौद्धमय करीन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू याच घोषणेनंतर झाला. ६ डिसेंबर १९५६ ला झालेला तो मृत्यु आकस्मित नव्हे तर बौद्ध धम्म स्वीकारू नये म्हणून ब्राह्मणवाद्याकडून घडुन आणलेली खेळी होती असे आता जगजाहीर झाले आहे. नागपूरच्या धर्मांतर सोहळ्यानंतर पुढे बाबासाहेब १६ डिसेंबर १९५६ ला मुंबई मध्ये सुध्दा विशाल बौद्ध धर्माचा दीक्षा समारोह, बौद्ध धर्मांतराचा सोहळा आयोजित करणार होते. तसेच पुढे त्यानंतर उत्तर प्रदेशातील जौनपुरला देखील लाखो लोकांची धर्मांतराची सभा ३१ डिसेंबरला आयोजित करणार होते. यावरून असे अनुमान काढले जाऊ शकते की नेपाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली होती त्यावर ते आमल करत होते आणि त्या दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आकस्मित जाण्यामुळे बुद्ध धम्माच्या पुननिर्माणाच्या चळवळीला मोठा अवरोध निर्माण झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय चळवळीची शकले झाली. त्याचबरोबर बौध्द धम्माची चळवळ सुद्धा थांबली गेली.आजच्या वर्तमानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बौद्ध धम्म चळवळ समजून घेणे नितांत गरजेचे बनले आहे. त्यासाठी आशा धम्म शिबिराची आणि कार्यशाळाचे जागो जागी आयोजन करणे गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होते की, भारत बौद्धमय करणे आणि भारतातील बहुजनांना शासक जमात बनवणे, पंरतु याकडे काहींनी थट्टामस्करी म्हणून पाहिले तर काहीनी उपहासात्मक, नकारात्मक पाहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माला देशामध्ये पुनरुञ्जीवीत करण्यासाठी जी ब्लू-प्रिंट बनवली होती त्यावर अंमल करण्यासाठी व कार्ययोजना करण्यासाठी सनातन धम्म ही संघटना अस्तित्वात आलेली आहे. त्यासाठी पूर्ण देशभर या संघटनेचे जाळे निर्माण केले जात आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील योजनाबध्द संघटनात्मक वाढ व विस्तार होत आहे. याला व्यापक स्वरूप देण्यासाठी उद्दिष्टपूर्ण, लक्षभेदी, अनुशासित कार्यकर्त्याची फौज निर्माण करणे तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी ६ व ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यस्तरीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये धम्माचे कार्य कशा पद्धतीने गतिमान केले जाऊ शकते याबद्दल सविस्तर चिंतन मनन व प्रशिक्षणातून दोन दिवस सखोल मार्गदर्शन होणार आहे. या शिबीराला आपण उपस्थित राहून हे धम्माचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी तन मन धनाने यात सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रा. अमोल सोनवणे, अर्जुन काटे, ज्ञानेश्वर कोकणे, राकेश भारगावे, सिद्धार्थ नागरत्ने, राज बोकेफोडे यांनी केले आहे.
- अधिक माहितीसाठी संपर्क:-
- प्रा. अमोल सोनवणे - ९०९६९९५९४४
- मा. अर्जुन काटे- ८१०८८ १४४९९
- मा. दिपक भालेराव ८६९३८ ४७०८५
- मा . सुमेद खंदारे ८४४६४ ५८९९३
- नोंदणी शुल्क कर्मचारीः ७०० रु नॉन कर्मचारी ५०० रु (प्री रजिस्ट्रेशन)
- नोंदणी शुल्क भरण्यासाठीचा नंबर शुभम दाभाडे - ९६६५६ ६९९८४
0 टिप्पण्या