Top Post Ad

जातीवरून घर विकण्यास भाग पाडण्यासाठी त्रास देणाऱ्यांवर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी

जातीभेद करून मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी मारहाण करणे, जमिन हिसकावणे असे सर्रास प्रकार जास्तीत जास्त खेडेगावात घडत असतात. आजही हे प्रकार सुरूच आहे. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकरणी तक्रारदाराला न्याय मिळाला असल्याचे निदर्शनास आलेले नाही. अपवादात्मक एखाद्या घटनेत न्याय मिळाला असेल, पण अधिकांश प्रकरणी सरकार आणि प्रशासन या प्रकरणात आपला जातीवाद कायम जपत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार मुंबईसारख्या मेट्रोपोलिटियन शहरात देखील घडत आहे.  मुंबईतील सांताक्रुझ परिसरात जुहूतारा रोड येथे एकता रहिवाशी संघ सोसायटीत रहात असलेल्या  सुहास धर्माजी कदम यांना त्यांच्याच राहत्या घरातून बेदखल करण्यासाठी आजुबाजूची जातीवादी मंडळी नाहक त्रास देत असल्याचे कदम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांना सांगितले. 

कदम परिवार या विभागात  राहणारे एकमेव बौध्द कुटुंब आहे. गेले ३० वर्षापासून ते रहात आहे. त्यांचा छोटा  मुलगा व्यसनाधिन असल्याने त्यांच्यात नेहमीच भांडण होत असतात. याचा फायदा घेत तेथिल स्थानिक महिला  ललिता रामचंद्र भरीष्टे, हिरा राजू झा, विता बळीराम मोरे ह्या सुहास कदम यांना एनकैन प्रकरणी नाहक त्रास देत आहेत. आमदार फंडातून आलेल्या पाण्याच्या नळाची लाईन सुध्दा कापली. सुहास कदम यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. त्यानंतर पोलिस प्रशासन आणि महानगर पालिका यांना विनवणी करून त्यांनी ती लाईन पुन्हा सुरु करून घेतली. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरी कोणी पाहूणे अथवा मित्रमंडळी आले तर त्यांना अर्वाच्च भाषेमध्ये शिव्या देण्याचा प्रकार कायम सुरू असतो. त्यातूनही काही साध्य झाले नाही, तर घरात घूसन मारहाणीचा प्रकार देखील या महिलांनी केला आहे.  मुलासोबत असलेल्या भांडणाचा फायदा घेऊन मुलाकरवी त्यांचे राहते घर परस्पर विकण्याचा प्रकारही या महिलांनी केला असल्याचा आरोप सुहास कदम यांनी केला. तरीही आपण हे घर सोडत नाही म्हणून  हे लोक मला मारण्याचे षडयंत्रच रचत असल्याची भीती देखील कदम यांनी व्यक्त केली.

याबाबत आपण आतापर्यंत अनेक वेळा पोलिसांत तक्रार केली आहे. इतकेच नव्हे तर समाजातील  नेतेमंडळीकडेही याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र या नेतेमंडळींकडून कोणत्याही प्रकारची विचारणा अथवा मदत झाली नसल्याने आपण फार हताश झालो असून याबाबत आता न्याय न मिळाल्यास मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसणार असल्याचे सुहास कदम यांनी पत्रकारांना सांगितले. 

संपूर्ण महाराष्ट्रात बौध्द परिवार जेथे जेथे एकटे रहात आहे त्या ठिकाणी अनेक वेळा जातीवादी लोकांकडून या परिवाराला त्रास देण्याचा प्रकार घडला अथवा अमानवी कृत्य सुध्दा त्या परिवारावर होताना आपण बघितले आहे. त्याचीच पुनरावृत्ती माझ्या विभागात होताना दिसत आहे. मी अनेकदा याबाबत सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या पण सांताक्रुज पोलीस राजकीय दबावामुळे त्या महिलांवर, तसेच माझ्या घरावर ताबा घेण्याकरिता जबरदस्ती करणाऱ्या मुलावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. मला विश्वासात न घेता या महिलानी माझ्या घरात जबरदस्तीने अधिकचे डिपॉजिट् घेऊन माझ्या मुलाला बाहेर ठेवले आहे.  मला आणि माझा दुसरा मोठा मुलगा यांना एकाकी पाडून आम्हाला घराबाहेर काढण्याचे षडयंत्र करणाऱ्यां विरुध्द जातिवादक (ऍट्रॉसिटी) कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कदम यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com