- ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या ठाणे शहरातील तलावांपैकी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबाबत शिवसेना नेते यांनी वारंवार ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्र व्यवहार करण्यात आला होता . वारंवार वृत्तपत्रातून येणारी कात्रण घेऊन 22 जानेवारी रोजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वस्तुस्थिती दाखवण्यात आली त्यानंतर 7 फेब्रुवारी मध्ये ठाणे महापालिकेने गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे असे पत्राद्वारे कळवले परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू केले नाही त्याचबरोबर ठाणे महापालिकेने या तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत 5 कोटी 50 लाखाचा प्रस्ताव बनवून शासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असे लेखी आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम त्या ठिकाणी सुरू केल्याने या तलावाला दुर्गंधी पसरली असल्याने मच्छर डास यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे .
प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचे काम सुरू केले आहे परंतु अद्यापही गेल्या अनेक वर्षापासून पडलेला गाळ ही तेथे उचलला जात नाही. प्रदूषण विभाग काय करीत आहे ? असा सवाल उभा राहत आहे या तलावाकडे जाणून-बजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मृत मासेंचे फोटो दिले आहे. त्या पत्रामध्ये येणारा पावसाळा लक्षात घेऊन या तलावा भोवती मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे जर तलाव भरून झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.शासनाने निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून कामे सुरू केली परंतु निधी अभावी आज शहरात अर्धवट स्थितीत कामे बंद पडलेले आहेत. आज ठाणे महापालिकेची परिस्थिती रसगळाला गेलेले असताना ठाणे महानगरपालिकेला शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागते. परंतु शहरात आवडत्या ठेकेदारांचे कामे सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो. हा पैसा जनतेचा आहे हा कोणी ठेकेदाराचा ना ..कोणी मंत्र्यांचा पैसा नाही तो विकास निधी सर्व ठिकाणी समभाव प्रमाणे वाटप झाला पाहिजे कारण या जनतेनेच तुम्हाला निवडून दिलेल्या आहे असे मत राजन विचारे यांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या