हा आहे कुणाल कामरा. एके काळी ह्याने राहुल गांधीवरही आपल्या गाण्यातून सडकून टिका केली होती. ही टिका फक्त 'ठानेकी रिक्षा' एवढ्यापुरतीच नसून त्यापेक्षा कितीतरी प्रचंड जहरी होती. त्यावेळेस राहुल गांधी कामराला शोधण्यासाठी त्याच्यापाठी हात धुवून लागला नाही किंवा त्याच्याविरोधात राहुलने साधा एफआयआरही नोंदविला नाही. त्याचा परिणाम तुम्ही खाली पाहतच आहात. कुणाल कामरा भारत जोडो यात्रेत आला आणि राहुलनेही त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले. मग कुणाल कामराही राहुलच्याबरोबर पावलावर पाऊल ठेवून या निर्भय बनो मार्चमध्ये चालू लागला. लिडर बनणे म्हणजे खाऊ नाही भाऊ! त्यासाठी पेशन्स असावे लागतात. कुणाल आणि राहुल, तुमच्या दोघांच्या स्पोर्ट्स्मनशीपला मनःपूर्वक सॅल्युट! - - विवेक मोरे
- *कुणाल कामराला धमकी देणा-यांवर कडक कारवाई करण्याची धमक फडणवीस सरकारने दाखवावी -
- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुंडांना आवरा, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, जंगलराज नाही.*
- *छत्रपतींचा अपमान केल्यावर सरकारने संताप व्यक्त केला नाही वा कारवाई ही केली नाही.*
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या गुंडांनी केलेली तोडफोड चिंताजनक व कायद्याच्या राज्यात शोभणारी नाही. कुणाल कामाला सत्ताधारी थेट धमक्या देत असताना भाजपा युती सरकार झोपले आहे का ? सत्ताधा-यांना गुंडगिरी करण्याची मोकळीक दिली आहे का? असा संतप्त सवाल करत सत्ताधारी पक्षाच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची धमक दाखवावी, एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी मांडलेला उच्छाद निंदनीय असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडला आहे. लोकशाहीत टीका स्विकारायला शिकले पाहिजे असे पंतप्रधान मोदी दोनच दिवसापूर्वी म्हणाले आहेत. तुम्हाला टीका सहन झाली नाही तर लोकशाही मार्गाने त्यावर कारवाई करावी पण ठोकशाही कशासाठी. भाजपा व त्यांचे मित्र पक्ष विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांची बदनामी करतात तेव्हा चालते का? शिंदे सेनेचे नेते कुणाल कामराला थेट धमक्या देत आहेत आणि त्याच्यावर हल्ला करण्याचं आवाहन करत आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यक्रमस्थळी आणि कलाकाराला सुरक्षेची हमी द्यावी. शांततेत आंदोलन करण्याचा हक्क सगळ्यांना आहे, पण हिंसा आणि धमक्यांचा हक्क कोणालाच नाही. कायदा हा सर्वोच्च स्थानी राहिलाच पाहिजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांसारख्या अक्कलशून्य लोकांनी अपमान तेव्हा या सरकारकडून कोणताही संताप व्यक्त करण्यात आला नाही. पण एका विनोदी कार्यक्रमावरून मात्र हे सरकार हादरलं आहे. ज्या ठिकाणी स्टँडअप कॉमिक कुणाल कामरा यांनी परफॉर्मन्स केला, त्या हॅबिटॅट या ठिकाणावर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोडफोड केली. जेव्हा सत्ताधारीच कायद्याचा आदर करत नाहीत, तेव्हा सामान्य माणसानं कायद्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? या हल्ल्यानंतर हॅबिटॅटनं भीतीच्या वातावरणामुळे तात्पुरतं आपलं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ एक सांस्कृतिक जागा नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि आज तेच भयाच्या छायेखाली आहे, - खासदार वर्षा गायकवाड
0 टिप्पण्या