संविधानिक मूल्यांना समर्पित, सत्यशोधक समाज १५१ वर्षपूर्ती, भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित १९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५, आमखास मैदान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).......नाटक, भव्य पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, गटचर्चा, विशेष मुलाखत, शाहिरी जलसा, बालमंच, रॅप, युवा मंच, लघुचित्रपट, चित्रप्रदर्शन, शिल्पकला, एकपात्री प्रयोग, विशेष मुलाखत
बिद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक जाहीरनामा आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतीराव फुले यांना दिले; तेव्हा "तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानबाचे हित होईल याचे बीज नाही." असे म्हणत म. फुलेंनी "उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादाच्या" त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता. आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे २० व्या शतकातील स्वरूप म्हणजे अ.भा. मराठी साहित्य संमेलन आहे. अ. भा. साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात परशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवण्याचा आग्रह, ठाण्यात संमेलन स्मरणिकेत महात्मा यांच्या खुन्याचा पंडित नथुराम' असा उल्लेख करणे असेल. संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शा. गव्हाणकर, शा. अमर शेख, शा. वामनदादा कर्डक, शा. यशवंत चकोर, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही न देणे; उलट अनेक दांभिकांना अध्यक्षपदे बहाल करणे, स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, संविधान जाळण्याचे समर्थन करणारांना प्रतिष्ठा देणे अशी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत. किंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मूखंडच आहे. म्हणूनच ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-अबिडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती व साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे. कालकथित बाबुराव बागुल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
सध्या देशात असहिष्णू वृत्ती थैमान घालत आहे. भारतीय नागरिकांनी काय खावे, काय खाऊ नये कोणत्या विचारांचा प्रचार प्रसार करावा आणि करू नये, लग्न, प्रेम कोणाशी करावे आणि करू नये, हिंदू स्त्रियांनी किती अपत्ये जन्माला घालावी इत्यादी संदर्भात ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्य विचार व संस्कृती लादण्याचे प्रकार आणि त्यासाठी हिंसा आणि दहशतीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही प्रवृती कायदा हातात घेऊन पछाडलेले जमाव सोबत घेऊन मॉब लिंचिंग घडवत आहेत. संस्कृतीच्या संभावित टेहाळणी बुरूजांवरून ही प्रवृत्ती सामान्यजनांच्या जीवनावर नियंत्रण गाजवत आहे. महात्मा गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडत नथुराम प्रवृत्तीचे गौरवीकरण उघडपणे केले जात आहे. संसद, न्यायपालिका, आर्थिक संस्था अशा सर्व लोकशाही संस्था खिळखिळ्या केल्या जात आहेत. विरोधकांना संपविण्यासाठी शासकीय तपास यंत्रणा ईडी, सी.बी. आय. एनआयएचा वापर केला जात आहे. सांस्कृतिक दहशतवाद आक्रमकपणे अंमलात आणला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तींचा नंगानाच चालू आहे. इतिहास, संस्कृती परंपरेचा गैरवापर करत खोट्यानाट्या कंड्या पिकवत, जाणीवपूर्वक हिंसेचे शास्त्र तयार करणाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून बहुमान मिळत आहे. धार्मिक दंग्यासाठी वादग्रस्त प्रश्न उकरून काढले जात आहेत,
आज बहुजन समाजाला अवमानित करण्यासाठी महामानवांच्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. ते करणाऱ्या ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देऊन भागले नाही, तर पयाभूषण देऊन बहुजनांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आता जेम्स लेन प्रकरणी पाहिलेले इतिहासाचे विकृतीकरण चित्रपटात आणले जात आहे, उद्या ते पाठ्यपुस्तकातही येण्याची शक्यता आहे. कारण महामानवांच्या बदनामीला केंद्रीय सत्तेचा राजाश्रय लाभला आहे. स्वतः राज्यपालच छत्रपती शिवाजी महाराज व आई सावित्रीबाई फुले यांची बदनामी करत आहेत. समतावादी विचारांना देशद्रोही ठरवले जात आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खूनी अजूनही मोकाट आहेत. इतिहासाचे विकृतीकरण, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, राज्यघटना बदलाचे राजकारण, समाजाचे जातीजमातीत विभागीकरण, लैंगिकतेचे वस्तुकरण, आदिवासींचे बनवासीकरण यांतून भारतीय संस्कृतीच्या मुळावर हल्ले चढवले जात आहेत. सारखं आंबेडकर.. आंबेडकर... आंबेडकर काय करता? असा प्रश्न अमित शहा संसदेत विचारत आहेत. फातिमाबी शेख अस्तित्वातच नव्हत्या अशी कंडी मंडल बंडल पिकवत आहेत. आरक्षणावरुन जातीयुध्द पेटवले जात आहे. या पार्श्वभूमीवर कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात कष्टकरी व बंचितांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या करणारी विद्रोही साहित्य संमेलने १९९९ पासून आपण आयोजित करीत आलो आहोत, समता, लोकशाही व आत्मसन्मानाची एक घनघोर लढाई,
मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे. आपणही या विद्रोही साहित्य संमेलनास सहकार्य करून, उपस्थित राहून या महाप्रवासात सामील व्हावे, जनतेच्या जाणिवा बधिर करणाऱ्या वर्चस्वादी चंगळवादी संस्कृतीला नकार देत बंधु-भगिनीभाव व सामाजिक बांधिलकीचा नवा आविष्कार या कृत्रिम मेंदूच्या (ए.आय.) युगात घडवूयात.
वर्तमानातील मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. राज्यघटनेने दिलेले हक्क काढून घेण्याचे काम चालले आहे. हुकुमशाहीवादी सरकारने विद्यार्थीविरोधी नवे शैक्षणिक धोरण, आदिवासीविरोधी वनविधेयक, कामगारविरोधी चार कायदे, शेतकरीविरोधी तीन कायदे आणून जनविरोधी कृतीचा सर्वोच्च कहर दाखवला. शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणा-यांना आणि पुरोगामी लोकशाहीवादी विचारवंत नेते कार्यकर्ते यांना देशद्रोही ठरवले जात आहे. शेतकरी आत्महत्यांनी आज उच्चांक गाठलेला आहे, समतावादी राष्ट्र उभारणीचा एकमय राष्ट्र निर्मितीचा फुले, शाहू, शिंदे, आंबेडकरी विचार धोक्यात आणला आला आहे. संविधान समर्पित स्वातंत्र्य, समता, बंधु-भगिनीभाव इत्यादी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहेत. शेतकरी, कष्टकरी, दलित, भटके, विमुक्त आदिवासी, बहुजन, ओबीसी, अल्पसंख्यांक भयभीत झाले आहेत. अशा उच्चजातवर्गपितृसत्ताक हुकुमशाहीविरोधात अ. भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात जाणारे साहित्यिक एक शब्दही काढणार नाही. त्यांचा इतिहासच सत्ताधाऱ्यांची लाचारी करत दक्षिणा ओरबाडण्याचाच आहे. म्हणून तर कुठल्याही सांस्कृतिक राजकीय दहशतवादाला बळी न पडता अघोषित आणीबाणीला विरोध करत सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहणे, हीच एकमेव लोकशाहीवादी, खरी समताबादी स्वाभिमानी सांस्कृतिक कृती आहे. यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन संयोजन व त्यातील सहभाग अगत्याचा आहे.
बहुभाषिकता, धार्मिक व सांस्कृतिक बहुविधतेसह संविधान मूल्यांना समर्पित १९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन सत्यशोधक समाज १५१ वर्षपूर्ती आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अंजिठा-वेरूळ अजरामर शिल्प संस्कृतीचा वारसा असलेल्या, वारकरी संतांच्या व शिवस्वराज्य लढ्याच्या महत्वपूर्ण केंद्रात, मलिक अंबरच्या शहरात, सत्यशोधक महंत ज्ञानगिरी बुवा यांच्या जन्मभूमीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानदान नगरात, मराठवाडा स्वातंत्र्ययोध्दांच्या, समतावाद्यांच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दि.२१-२२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. म्हणूनच अघोषित आणीबाणीला नकार देण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बहुजनांच्या समता संस्कृतीचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधान सन्मानासाठी, या संमेलनात सहकुटुंब सहभागी व्हा...! सहकार्य करा.... !! विद्रोहाचा आबाज बुलंद करा !!!
• विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी. .......अध्यक्ष : प्रा. प्रतिमा परदेशी उपाध्यक्ष अर्जुन बागूल, प्रा. डॉ. विठ्ठल घुले, मन्साराम पवार, डॉ. विलास बुवा, कार्य. सेक्रेटरी: यशवंत मकरंद कार्य. संघटक किशोर ढमाले, खजिनदार: एल. जे. गावित, संघटक : अॅड. सुदीप कांबळे, आर. टी. गावित, हसिब नदाफ, डॉ. अशोक चोपडे, डॉ. लीलाधर पाटील, डॉ. मारोती कसाब, अमिन शेख, डॉ. किशोर इंगोले, विठ्ठलराव जाधव, यशवंत फडतरे
१९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजीनगर कार्यकारिणी......स्वागताध्यक्ष : मा. सतिश चकोर, मुख्य निमंत्रक अॅड. धनंजय बोरडे, कार्याध्यक्ष खालिद अहमद, कार्यवाह: भाऊसाहेब जाधव, खजिनदार: के.ई. हरिदास, मुख्य समन्वयक प्रा. भारत सिरसाट, राजानंद सुरडकर, अॅड. वैशाली डोळस, उपाध्यक्ष : अनंत भवरे, सविता अभ्यंकर, अॅड. अभय टाकसाळ, सहकार्याध्यक्ष सुनिता शिंदे, सुलभा मुंडे, सहकार्यवाह : ग. ह. राठोड, मधुकर खिल्लारे
,• स्वागतोत्सुक साहित्यिक, कलाकार, छत्रपती संभाजीनगर. .,.प्रा. रामप्रसाद तौर, के.ई. हरिदास, चंद्रशेखर शिखरे, अरबिंद खैरनार, सावित्री महामुनी, डॉ. रेखा मेश्राम, डॉ. बोडोंपत मानवतकर, स.सो. खंडाळकर, रमेशभाई खंडागळे, प्रकाश बनसोड, डॉ. मारूती तेगमपुरे, अॅड. एस. आर. बोदडे, डॉ. उमाकांत राठोड, मंगल खिंवसरा, इंजि. महेश निनाळे, अॅड. विकास पाटील, मधुकर गवंदे, दैवशाला गवंदे, सुनिल उबाळे, डॉ. समाधान इंगळे, सुदाम मगर, शा. वसुधा कल्याणकर, अॅड. सुधाकर नवसागर, नवसाजी हणमंते, मारूती गिन्छे, प्रा. ना.तू. पोये, शैलेंद्र मिसाळ, जितेंद्र भवरे, सुधाकर निसर्ग, अंबादास रगडे, डॉ. विनय हातोले, रतनकुमार साळवे, अमरदीप बानखडे, संध्या जाधव, डॉ. संजय पाईकराव, डॉ. मधुकर दिवेकर, जयपाल सुकाळे, प्रशांत बोराडे, अक्रम खान, अॅड. संघपाल भारसाखळे, प्रा. भ.पुं. कालवे, सुधाकर निसर्ग, अश्वजित पडघन, पंडितराव तुपे, विष्णू वखरे, अॅड. विजय वानखेडे, लोकेश कांबळे, अॅड. एकनाथ रामटेके, अॅड. विलास बिराजदार, भास्कर गंगावणे, सिद्धार्थ दाभाडे, अशोक खरे, विश्वास म्हस्के, रमेश पटेकर, गोरख नलावडे, प्रेमदास गवळी, आर.पी. गायकवाड, राम निकाळजे, ज्ञानदेव गायकवाड, डॉ. सागर चक्रनारायण, सोनाली म्हस्के, अॅड. सुभाष निकम, दीपक पगारे, प्रा. मच्छिंद्र गोर्डे, विवेकानंद सुकाळे, बालाजी जावळे, ललिता खडसे, डॉ. वंदना पाटील, इंजि. वाहेद कादरी, अहमद कादरी, विश्वास म्हस्के, रमेश धोंडगे, अॅड. सोमनाथ वाघमारे, उद्धव सोळंके, प्रा. सुनिल वायसळ, गहूल चव्हाण, डॉ. अविनाश अंकुशराव, दीपक पगारे, सानप, सत्यजीत म्हस्के, श्रद्धा खरात, स्वाती आदोडे, अॅड. सुनिल राठोड, शेख खुरम, अॅड. दीपक म्हस्के, अॅड. अमोल घोचले, अॅड. धनेश गवळी, अॅड. जयश्री भगत, अॅड. मिलिंद काकडे, अॅड. लता बामणे, अॅड. योगेश गायकवाड, अरूण कांबळे, क्षमा बरडे, शारदा पगारे, भाऊ पठाडे, भिमराव गाडेकर, शहाजी भोसले, चंद्रकांत चव्हाण, कॉ. भास्कर लहाने, धम्मपाल जाधव, धम्मप्रिया खरात, सुनिल डोके, डॉ. बाळासाहेब कुलकणीं, डॉ. ललिता गिन्हे, सुनंदा जाधव, प्रा. सुनिल बनकर, प्रा. गोपालकृष्ण खोमणे, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, धम्मप्रिया खरात, राजेश वामन, अॅड. डी.व्ही. खिल्लारे, श्रीरंग ससाणे, के.टी. उपदेशे, डॉ. यशवंत खडसे, एकनाथ खिल्लारे, डॉ. अशोक गायकवाड, गुलाबराव मगर, उद्धव सोळंके, सुनिल शिंदे, ज्योती अशोक चाटसे, अॅड. आम्रपाली वाव्हळे, पुष्पा सूर्यवंशी, अॅड. अमोल घोवले, प्रशांत मगरे, सुषमा मते, छाया जवंजाळ, नंदा जोगदंड, कृष्णा भंडारे, रमा चव्हाण, कांचन गादीकर, ज्योती गावंडे, उषा मुळे, उज्ज्वला देशमुख, सत्यभामाबाई पाटील, शुभांगी कोकाटे, अरूणा गाडे, मार्गदर्शक : डॉ. प्रल्हाद मुलेकर, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. भालचंद्र कांगो, शांताराम पंदेरे, साथी सुभाष लोमटे, कॉ. भीमराव बनसोड, डॉ.एम. ए. वाव्बुळ, प्रा. राम बाहेती. भीमराव सरवदे, प्राचार्य डॉ. संजय मून, अॅड. डी. आर. शेळके, साथी आण्णा खंदारे
0 टिप्पण्या