Top Post Ad

प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे बेस्ट बस प्रवाशांचा जीव धोक्यात

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा क अर्थसंकल्प असून, सदर अर्थसंकल्पात आधिक्य निर्माण झाल्यास, तो निधी महापालिकेच्या निधीमध्ये समाविष्ट करण्याची तरतूद कलम ४६० (लल) नुसार असून तूट निर्माण झाल्यास, महापालिकेच्या इतर अर्थसंकल्पातून सदर तूट भरून काढून रूपये १ लाख शिल्लक ठेवण्याची तरतूद कलम १३४ नुसार आहे. मुंबईकर जनतेला नियमितपणे बेस्टची चांगली व अल्पदरात प्रवासी वाहतूक सेवा देण्याकरिता बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकिच्या किमान ३३३७ बसगाड्या कायम राखणे आवश्यक आहे. आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला द्यायचा आहे. परंतु २०१९ नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. परिणामी बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बसगाड्यांचा बसताफा आजघडिला केवळ ९९८ इतकाच शिल्लक राहिलेला आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त ७६१ बसगाड्या शिल्लक राहतील व ३० नोव्हेंबर, २०२५ ला बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त २५१ (८%) बसगाड्या शिल्लक राहतील आणि येणाऱ्या काळात ही सेवा बंद होईल असे स्पष्ट मत शशांक राव यानी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी प्रकाश नायर, संजय शेलार, अजित मोहिते, धनंजय पाटील, रामराव गिते, सुभाष घाडिये आदी मान्यवर उपस्थित होते. 

 बी.ई.एस.टी. (BEST) ची विश्वासहार्य, सुरक्षीत, अल्पदरात मिळणारी ही अत्यावश्यक सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा येणाऱ्या काळात बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईकर जनतेसाठी हा अतिशय चिंतेचा विषय आहे. बेस्ट बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईकरांना बेस्टची अल्पदरात मिळणारी ही अत्यावश्यक सेवा सुरक्षीत आणि नियमीत सुरू राहणे ही मुंबईकर जनतेवी आणि मुंबई शहराची मुलभूत गरज आहे. बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या किमान ३,३३७ बसगाड्या कायम स्वरूपी राखाव्यात याकरिता बेस्ट बचाओ (BEST BACHAO) हे अभियान जूलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आले होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईकर जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली होती.

आज आम्ही बेस्ट बचाओ अभियाना मार्फत पुन्हा मागणी करत आहोत की, मुंबईकरांना सुरक्षित आणि विश्वासार्ह, अल्पदरात सार्वजनिक बस सेवा देण्याकरिता खाजगी कंत्राटदार (Wet-lease) पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी. तसेच बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये दि. ११ जून, २०१९ रोजी झालेल्या एम.ओ.यु. प्रमाणे बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्यांचा बसताफा तातडीने राखावा व या पुढे मुंबईकर जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देण्याकरिता लागणाऱ्या बसगाड्या बेस्टच्या स्वमालकीच्याच असाव्यात व त्या गाड्या बेस्ट उपक्रमानेच चालवाव्यात. या मागणीकरिता  बुधवार, १८.डिसेंबरपासून रेल्वे स्थानकांबाहेर, बस टर्मिनस व इतर मोक्याच्या ठिकाणी मुंबईकर जनतेचे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येईल व मुंबईकर नागरीकांचे स्वाक्षरी केलेले निवेदन ना. देवेन्द्रजी फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येईल. तसेच पथनाट्यद्वारे मुंबईकर नागरीकांमध्ये वरील विषयासंदर्भात जनजागृती करण्यात येईल. मुंबईतल्या प्रवासी संघटना, मुंबईकर नागरीकांसाठी काम करणाऱ्या एन.जी.ओ., सामाजिक कार्यकर्ते, हाऊसिंग असोसिएशन्स व अश्या इतर संघटनांच्या प्रतिनिधींना या अभियानामध्ये सहभाग घ्यायचा असल्यास त्यांनी या भ्रमणध्वनी क्र. ९८६७७७३३३९ वर संपर्क साधावा.असे आवाहन निमंत्रक शशांक राव यांनी केले आहे.

कुर्ला येथे दि. ०९.१२.२०२४ रोजी रात्री झालेल्या बस अपघाताची घटना दुःखद आहे. या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. बेस्ट उपक्रमातर्फे गेली ७७ हून अधिक वर्षे मुंबईकर जनतेला सुरक्षित व अल्प दरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा प्रदान केली जात आहे. मात्र मागील काही वर्षात प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या घटना वारंवार घडताना दिसत असल्याचा आरोपही राव यांनी केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com