लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांची 'जीभ कापून आणणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षिस देऊ असे अत्यंत आक्षेपार्ह विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तसेच भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी 'राहुल गांधी यांच्या जीभेला चटके द्या' असे विधान करून मा. खा. राहुलजी गांधी यांना शारिरिक इजा पोहचवावी, गंभीर दुखावत करावी, अशा पद्धतीची गुन्हेगारी स्वरुपाची विधाने केलेली आहेत. लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षनेते पद हे संवैधानिक पद आहे, त्या पदाची प्रतिष्ठा आहे. त्याचा मान राखला पाहिजे परंतु गायकवाड व बोंडे या लोकप्रतिनिधींनी जी भाषा वापरली ती गुन्हेगारी प्रवृत्तीला चिथावणी देणारी आहे, अशा भडाकाऊ विधानाने राहुल गांधी यांच्या जीवाला गंभीर धोका होऊ शकतो. गांधी कुटुंबातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या करण्यात आल्याचे आपणास माहिती आहेच. गांधी कुटुंबाच्या जीवाला नेहमीच धोका आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता बोंडे व गायकवाड यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, अशा मागणीचे पत्र आज काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्तांना देण्यात आले. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन हे पत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, विक्रम ठाकूर उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाकडून खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथील घरासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीसांनी काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली, त्यानंतर विधानभवनात निवेदन देण्यास जात असतानाही अडवण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते जननायक राहुल गांधी यांना धमकी देणारा शिंदे शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड आणि भाजपा खासदार अनिल बोंडेला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवत नाही, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निषेध आंदोलन सुरु होण्याआधीच ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली जाते. अशा कारवायांना काँग्रेस भिक घालत नाही. संजय गायकवाडांना निलंबित करा व अनिल बोंडे आणि गायकवाडांना अटक करा, राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, धमकी देणाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करते. भाजपा युतीचे जुलमी सरकार राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेने घाबरले आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे भाजपा सरकारसाठी त्रासदायक आहेत म्हणूनच राहुल गांधींना धमकी देण्यावर भाजपा उरतली आहे. काँग्रेस पक्ष राहुल गांधींचा अपमान कदापी सहन करणार नाही. बेताल बडबड करण्यावर कारवाई केलीच पाहिजे, - खासदार वर्षा गायकवाड
0 टिप्पण्या