Top Post Ad

बहाई समुदायाचा सर्वात महान रिझवान उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


  एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीस १२ दिवस, जगभरातील बहाई समुदाय त्यांचा महान उत्सव साजरा करतात हा उत्सव आज त्यांच्या मुंबईतील मरीन लाईन्स येथील प्रार्थना सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बहाई धर्माचे अवतार-संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे प्रेषित म्हणून घोषित केले. ही घोषणा बहाउल्लाह ह्यांनी २१ एप्रिल १८६३ रोजी बगदादमधील टायग्रिस नदीकाठी एका बागेत केली ज्या बागेला त्यांनी रिझवान म्हणजे स्वर्ग असे नाव दिले.  या काळात बहाउल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिक तत्त्वांची घोषणा केली. 

या काळात बहाउल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिक तत्त्वांची घोषणा केली. मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या एका नवीन टप्प्यावर येण्याचे संकेत म्हणजे शांतता आणि हिंसेचा अंत. विश्वात शांतता नांदावी म्हणून हा उत्सव संपूर्ण जगभरात साजरी करण्यात येतो.  सोबतच याच रिझवान उत्सवाच्या पहिल्या दिवशी जगभरातील हजारो भागात बहाई अनुयायी त्यांच्या स्थानिक प्रशासकीय परिषदांसाठी मतदान करतात. तो कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला.  उमेदवारी, नामांकन व प्रचार यांच्याशिवाय केवळ गुप्त मतदानाने व मतांच्या संख्याबळावर या निवडणुका पार पडतात. बहाई धर्म स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नऊ-सदस्यीय परिषदांद्वारे आपले कामकाज चालवते. 

. बहाई धर्माची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा १९४५ पासून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर कित्येक बहाई राष्ट्रीय आध्यात्मिक संघांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहिती केंद्रामधील अधिकृत यादीमध्ये समावेश आहे. सुमारे १७५ वर्षांच्या ह्या अल्पकाळात बहाईने एक जागतिक समाज प्रस्थापित केला आहे ज्यांन २११२ पेक्षा अधिक वेगवेगळ्या जाती जमातीचे, पार्थभूमिचे अनुयायी असून ते ३६५ हून अधिक स्वतंत्र देश, भूप्रदेश आणि बेटे यावर वसले आहेत, खरोखरच ते मानववंशाच्या सर्व वगाँचे प्रतिनिधित्व करतात, बहाई साहित्याचे भाषांतर जगातील ८०० हुन अधिक भाषांमध्ये झाले आहे. त्याची आध्यात्मिक सत्यता आणि देवी प्रेरणेने चालविलेल्या त्याच्या कार्यव्यवस्थेचा प्रभावीपणा ह्या सामर्थ्यातून आणि शक्तितून प्रतिबिंबित होतो.

जगभरातील हजारो स्थानांमध्ये व्यक्ती आणि समुदाय त्यांचे स्वतःचे जीवन सुधारण्याचे आणि सभ्यतेच्या प्रगतीला हातभार लावण्याचे कार्य करीत असताना बहाई धर्मश्रद्धेच्या शिकवणी त्यांना प्रोत्साहित करतात. बहाई धारणा अशा महत्वपूर्ण विषय वस्तूंना संबोधित करतात. ईश्वराचे आणि धर्माचे एकत्व, मानवजातीचे एकत्व, पूर्वग्रहांचा त्याग, मनुष्यमात्रांची अंतर्निहीत उदात्तता, धार्मिक सत्याचे प्रगतीशील प्रकटीकरण, आध्यात्मिक गुणांचा विकास, उपासना आणि सेवेचा समन्नय, स्त्रीपुरुषाची मौलिक समानता, धर्म आणि विज्ञान यादरम्यान सुसंगती, सर्व मानवी प्रयासांमध्ये न्याय केंद्रस्थानी असावा, शिक्षणाचे महत्व आणि मानवजाती तिच्या सामुहिक परिपक्वतेकडे अग्रसर होत असताना व्यक्ती, समुदाय आणि संस्थांना एकत्र गोवणाऱ्या संबंधांमधील गत्यात्मकता.

रिडवानच्या पहिल्या दिवशी! -  रिडव्हानच्या बागेत, गूढ तासात आता जमलो. रिडवानच्या बागेत, त्याच्या आशीर्वादित तंबूभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आणि नाईटेंगल्स गातात आणि आत्मे आगीत असतात. किरमिजी रंगाचा तारू रिडव्हानच्या बागेत, जगातील सर्वोत्तम प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीत प्रवास करतो. रिडवानच्या बागेत गुलाबांचा सुगंध मजबूत आहे. रिडव्हानच्या बागेत मित्र गप्प आहेत, भयभीत झाले आहेत. प्राचीन काळाने प्रकाशाचे असंख्य पडदे उचलले आणि नवीन निर्मिती रिडव्हानच्या बागेत जगातील सर्वोत्कृष्ट प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीत आनंदाने गाते. रिडवानच्या 12 दिवसांत नावांचा प्रभु त्याच्या सिंहासनावर आरूढ होतो. आता त्याच्याकडे जा आणि रिडवानच्या बागेत भरभरून चालत जा. त्याच्या कृपेच्या हातून सार्वकालिक जीवन रिडवानच्या बागेत, जगातील सर्वोत्तम प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीत सर्व मानवजातीला बहाल केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com