Top Post Ad

17 जानेवारीला बेघरांचा आझाद मैदानावर विराट मोर्चा


   रोटी,कपडा,मकान देण्याचा काम शासनाचे आहे.गेल्या अनेक वर्षापासून बेघर,भाडोत्र्यांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.राज्य सरकारने खारेगाव,ठाणे येथील जिल्हाधिका-यांच्या हद्दीतील मोकळ्या व पडीक जागेवर बेघरांना,भाडोत्र्यांना कायमस्वरुपी व पक्की घरे द्या,दोन हजार बेघारांचा जमिनीचा प्रस्ताव मान्य करा अशा प्रमुख मागण्यांसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ,खानदेश नागरी सेवा संघ या संस्थेच्या वतीने येत्या 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान मुंबई याठिकाणी विराट आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी दिली.यावेळी पत्रकारांशी बोलताना धनराज थोरात म्हणाले कि गेल्या पाच वर्षापासून कलेक्टर कार्यालय,तहसिल कार्यालय,मंत्रालय याठिकाणी अनेकदा पत्रव्यवहार,पाठपुरावा करुन देखील राज्य सरकार आमच्या मागण्यांवर गंभीर नाही.आतापर्यंत विविध जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 वेळा मोर्चा काढण्यात आले.मात्र गोरगरीबांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सरकार व प्रशासकिय अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करीत असल्याचा आरोप धनराज थोरात यांनी केला.सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित,शोषित,गोरगरीबांचा न्याय हक्कासाठी येत्या 17 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्च्यात राज्याच्या कानाकोप-यातून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते येणार असल्याचे धनराज थोरात यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com