Top Post Ad

त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही

 


 मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही. नाहीतर प्रगती खुंटलीच म्हणून समजा’ असे स्पष्ट मत मराठा आरक्षणाकरिता उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.  जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. 

 मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोनदा 26 दिवस आंदोलन केले. त्यातील दुसरे नऊ दिवसांचे उपोषण अन्न आणि पाण्याविना करण्यात आले. सगळ्यांचे मनोज जरांगे-पाटील हे गळ्यातले ताईत झाले. त्यांच्या संदर्भातील अनेक लेख, ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आपण बेमुदत उपोषण स्थगित केले असले  तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असे  कृत्य करायचे  नाही”, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले. ‘डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे  आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे’, असेही मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे,’ असेही ते म्हणाले.

मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक करत संपूर्ण हॉटेल पेटविण्यात आले होते. या हल्ल्याबाबत बोलतांना पाटील म्हणाले, बीड येथून काही लोकं आली होती. त्यानी सांगितले की, हॉटेल आणि घर हे भुजबळांच्या नातेवाईकांनी फोडले आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मराठा शांततेने आंदोलन करत असून सत्ताधारी या आंदोलनाला गालबोट लावत आहेत. हा माझा दावा तंतोतंत खरा आहे. मराठा समाजातील आंदोलकांनी जाळपोळ केली नाही. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करत आहेत.


S.C, :-13 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 58+1 बौद्ध
S.T, :- 7 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 47
O.B.C, :- 19 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 348
S.B.C, :- 2 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 7
V.J, :- 3 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 14
N.T.B, :- 2.5 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 28+7
N.T.C, :- 3.5 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 1
N.T.D, :- 2 टक्के त्यामध्ये समाविष्ठ हिंदू जाती 1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com