Top Post Ad

कंत्राटी भरती रद्द - शासन निर्णय काढण्याची मागणी

विविध पक्षसंघटनांच्या रेट्यानंतर सरकारी आस्थापनेतील  खाजगी भरती रद्द केल्याबद्दल भीम आर्मीच्या वतीने  दादर चैत्यभूमीवर जल्लोष करण्यात आला . राज्य सरकारने घोषणा केली असली तरी यासंदर्भातील रद्दीकरणाचा शासन निर्णय किंवा परिपत्रक त्वरित काढण्यात यावे तसेच कंत्राटी शिक्षक व पोलीस  भरतीचा निर्णयदेखील रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात कारणात आली . 

                   राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फ़त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला होता . सदर निर्णयामुळे सरकारमधील आरक्षित जागा धोक्यात आल्यामुळे भीम आर्मीने या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता . राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान भीम आर्मीने कंत्राटी कारण रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटील यांच्यावर शाईफेक करीत त्यांना काळे झेंडे दाखविले होते . मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार रॅम कदम यांच्या कार्यालयावर आंदोलन केलेले होते पुण्यातही आंदोलन झाले होते शिवाय  सरकारमधील सर्व मंत्री तसेच सत्तेतील खासदार आमदारांच्या कार्यालयावर आंदोलन करून हे कंत्राटीकरण रद्द करण्याचे निवेदन त्यांना देण्याचे निर्देश सर्व कार्यकर्त्यांना दिले  होते . 

 दरम्यान या विषयावर भीम आर्मीसह वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी भारतीय दलित कोब्रा आदी संघटनांनी देखील आंदोलने केली होती राज्यभर सरकारच्या या निर्णयाला होत असलेला प्रखर विरोध लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली ,. सरकारच्या या स्थागितीच्या निर्णयानंतर भीम आर्मीने दादर चैत्यभूमी येथे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करीत चैत्यभूमीवर आलेल्या नागरिकांना, भिक्खू संघाला  तसेच  स्टॉलधारकांना मोठ्या प्रमाणावर लाडूवाटप करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले .  

   यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे महाराष्ट्र ,उपाध्यक्ष रमेश बालिश,मुख्य महासचिव अविनाश गायकवाड ,  मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड, महासचिव विजय कांबळे, अविनाश समिंदर, जिल्हाध्यक्ष  जाहिद अली शेख, प्रकाश पाईकराव, प्रकाश मोरे , अलेक्स निर्मल यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली असली तरी हा निर्णय रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय किंवा परिपत्रक लवकरात लवकर जाहीर करावे तसेच कंत्राटी शिक्षक भरती व पोलीस भरतीचा निर्णय देखील रद्द करून सरकारी आस्थापनांचे खासजीकरण करण्याचे धोरण थांबवावे अशी मागणी अशोक कांबळे , अविनाश गायकवाड,व अविनाश गरुड यांनी यावेळी बोलताना केली  . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com