Top Post Ad

वृक्षांचे हत्यारे केव्हा जेरबंद होणार?


   मुंबईतील चेंबूरच्या टिळक नगरातील पंचशील नगर  येथील एसआरए प्रकल्प अंतर्गत बिल्डिंगचे काम सुरु असताना येथील परिसरातील अनधिकृत रित्या वृक्षाची हत्या करण्यात आली असून ही संबंधित दोषी व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्ष प्रेमी रमेश मुर्गेश लिंगतार यांनी गेली ४ वर्ष करूनही टिळकनगर पोलीसांनी कोणतीच कारवाई न केल्याने वृक्षांचे हत्यारे जेरबंद केव्हा होणार? म्हणून विभागात चर्चेला  उधाण आले आहे.

याबाबत असे की या पंचशील नगर मध्ये मे. प्रिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक हरेष गुरूबक्ष दौलतानी यांनी एसआरए प्रकल्प अंतर्गत काम सुरू केले होते त्यावेळेस त्याठिकाणी असलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. ही कत्तल वृक्ष प्राधिकरणाच्या विनापरवानगीने करण्यात आली होती. त्याची तक्रार वृक्ष प्रेमी रमेश मुर्गेश लिंगतार यांनी चेंबूर मनपा एम विभागाच्या उद्यान विभागाकडे दि. २९/१०/२०१८, दि. २९/९/२०२०, दि. २४/९/२०२०, दि. १/१०/२०२०, दि. ११/३/२०२०, दि. २९/१०/२०२०, दि. २५/११/२०२०, दि. २१/१/२०२१ या तारखांना तक्रारी केल्या आहेत. मात्र त्या तक्रारींची दखल टिळक नगर पोलीस ठाण्याने न घेता मनपा अधिकार्यांनी केलेल्या ३८वृक्षांपैकी ६ च वृक्षांची तक्रारी दाखल करून त्यांनी केलेल्या कारवाई संदर्भातील पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचे रमेश मुर्गेश लिंगतार यांनी सांगितले.

या अनधिकृत वृक्ष तोडी संदर्भात मनपा वृक्ष प्राधिकरणाने बिल्डर हरेष गुरूबक्ष दौलतानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु टिळक नगर पोलीस अधिकारी यांनी अन्य व्यक्ती च्या नावे खोटा जबाब नोंदवून विक्रोळी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. टिळक नगर पोलीस ठाण्याने न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सुरेश गायकवाड, (पञकार)  ९२२४२५०८७३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com