Top Post Ad

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपचा दावा

 

भाजपच्या मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून भाजपच्या वतीने ठाणे लोकसभा मतदार संघात मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा करण्यात आला. मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काहीजण आणत आहेत. अशा फुकटच्या वल्गना करण्याऐवजी सरकारच्या योजना तर राबवा, असा टोला केळकर यांनी नाव न घेता मित्रपक्षाला लगावला. ठाणे लोकसभा मतदारसंघ काही कठीण नाही, या ठिकाणी संघटनात्मक प्रचंड ताकद असून इथे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्याला आता दाखवून द्यायचे आहे की, ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून ते आतापर्यंत भाजपचाच आहे, आपली अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये भाजपचा कार्यकर्ता कमजोर होता कामा नये. त्यांनी आपली जिद्द सोडता कामा नये. त्यांनी आपली लढाई ही बुथवर लढली पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये पक्षाबद्दल प्रचंड अभिमान असला पाहिजे, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रात पुन्हा भाजपा-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे, हेच आमचे ध्येय आहे. त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. आमच्या कामांना जर कुणाचा विरोध असेल किंवा कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

“जेव्हा एखाद्या खासदाराच्या राजीनाम्यापर्यंत विषय पोहोचतो, तेव्हा सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे, असं काही नसतं. मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात व्हायला लागली असेल, तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल, याचा अंदाज आपण घेऊ शकतो,” -  एकनाथ खडसे 

एक वर्षापासून जेव्हापासून शिंदे गटाचे सरकार आलेलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, या ठिकाणी सातत्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये हे वाद चालूच आहेत.  शिंदे गट विरुद्ध भाजप हा संघर्ष सातत्याने चालूच आहे. दरम्यान, काल खासदार शिंदे यांनी जे वक्तव्य केले ते मी गांभीर्याने घेत नाही. कारण, ती वक्तव्य अभ्यासपूर्णही नाहीत. राक्षसी महत्वकांशी पोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आलं ते राजीनामा देतील का? त्यांच्याकडे नैतिकता आहे का? त्यांच्याकडे निष्ठा आहे का? त्यांच्याकडे समर्पण आहे का? या प्रश्नांच उत्तर नाही असं आहे. त्यामुळे ते राजीनामा अजिबात देणार नाहीत. त्यांना बोलायचं एक असतं आणि नाटक करायचं असतं. एखाद्या चित्रपटामध्ये साईड अॅक्टर असतात ना, तसे ते आहेत. कधीतरी ते अॅक्टींग करतात - आनंद परांजपे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com