Top Post Ad

फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 


  “बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर- 

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे  निर्देश

 आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि  शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री  शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले. 


  मागील सुमारे दीड महिन्यांपासून बार्टीचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लश केले होते. अधिवेशनातही या प्रश्नांवर कोणत्याही मागासवर्गीय आमदाराने चर्चा केली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार की काय अशी भीती निर्माण झाली असता दोन दिवसांपूर्वी काही संघटनांनी या विद्यार्थ्यांच्या मागे उभे  राहून सर्वकष आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार आज १२ एप्रिल रोजी अनेक संस्था संघटना पक्षांचे नेते यांनी या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला.  या आंदोलनामुळे अखेर सरकारला नमते घेऊन बार्टीच्या विद्यार्थ्या्च्या मागण्या मान्य कराव्या लागल्या असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. समाज एकत्र आला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा या प्रश्नाच्या माध्यमातून आला असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com