Top Post Ad

तर महाराष्ट्रावर आलेले हे संकट गेल्याशिवाय राहणार नाही


 शिवसैनिकांना कोणतीही लढाई ही नवीन नाही, आपल्या सारखे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक सोबत असतील तर महाराष्ट्रावर आलेले हे संकट गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हक्काचा आमदार, खासदार व आपल्या हक्काचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साथीने निवडून द्यायचा आहे. अशी भावना विनायक राऊत यानी व्यक्त केली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना अभियाना अंतर्गत आज मिरा भाईंदर जिल्हा शाखेच्या वतीने मिरारोड येथे आयोजित करण्यात आलेला शिवगर्जना मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, संपर्क प्रमुख ओवळा माजिवडा नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, धनेश पाटील, लक्ष्मण जंगम जयराम मेसे, शहर प्रमुख लक्ष्मण कंदळगावकर, चंद्रकांत मुद्रस, सतीश आचरेकर, जितु पाठक, शिवशंकर तिवारी, बर्नाड डिमेलो, प्रशांत सावंत, शिवसेना प्रवक्ता शैलेश पांडे, नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, अर्चना कदम, कॅटलीन परेरा, नगरसेवक जयंतीलाल पाटील, दिनेश नलावडे, जिल्हासंघटक  स्नेहल कल्सारीया, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, क्षमा गांधी, वीणा बद्रिके, विद्या कदम, शर्मिला बगाजी, जय लक्ष्मी सावंत, हेमलता जोशी, कांचन लाड, प्राची पाटील, शहर संघटक नीलम ढवण, श्रेया साळवी, तेजस्वी पाटील, अनिता रहाडे व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.

कसबा विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकीचा संदर्भ देऊन मतदार राजाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय न्यायालयाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढायचे आहे असे आवाहनही  राऊत यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले. जिंकेपर्यंत लढायचे हा निर्धार मनाशी बाळगून असंख्य शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने ही सभा मोठया उत्साहात पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com