नवा इतिहास
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान काय हा प्रश्न संघाची भळभळणारी जखम आहे.
या जखमेवर फायनली उतारा काढायचं ठरलेलं आहे.
सत्य असत्याची सरमिसळ असलेला नवा इतिहास नेमका कसा असणार आहे ?
आता मूळ मुद्दे.
- विदर्भात मिठागर नव्हती म्हणून जंगल सत्याग्रह केला गेला.पण मिठाच्या सत्याग्रहाला देशभरातून लोक दांडीला गेले होते.तिथे दांडीला महाराष्ट्रातून सुद्धा लोक गेले होते.मग विदर्भातून लोकांनी जाणे शक्य नव्हते का ? मिठावर लादलेला कर देणार नाही हि भूमिका होती आणि तोच सत्याग्रह होता ना ?
- सत्याग्रह करायला सरसंघचालक म्हणून दुसऱ्या माणसांची नेमणूक करण्याची गरज काय होती ? मग संघाचा सहभाग आंदोलनात होता कि डॉक्टर व्यक्तिगत पातळीवर आंदोलनात सहभागी झाले होते ? जर व्यक्तिगत पातळीवर सहभागी झालेले असतील तर संघाचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नव्हता हा मुद्दा पुन्हा अधोरेखित होत नाही का ?
- संघाचा सहभाग सिद्ध करायला स्मारक उभारणे आणि त्याचा मिठाच्या सत्याग्रहाशी संबंध जोडणे हे गांधीच्या आंदोलनाला मान्यता देणे , स्वातंत्र्य मिळायला गांधीची भूमिका आणि असहकार , सत्याग्रह आंदोलन महत्वाचे होते हे मान्य करणेच नव्हे काय ? गांधी विचारांचा जय म्हणून हुरळून जाणाऱ्या लोकांनी चौथा आणि शेवटचा मुद्दा नीट वाचावा.
- भविष्यकाळात दांडी मार्च विस्मृतीत ढकलला जाऊन पुसदच्या स्मारकाला महत्व येऊन दरवर्षी तिथे मेळावे वगैरे भरायला लागले तर पुढल्या पिढ्यांना स्वातंत्र्य जंगल सत्याग्रहाने मिळाले असा इतिहास शिकवला जाणार नाही काय ? अमर ज्योती ज्या पद्धतीने हटवली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या सत्तर वर्षातल्या वास्तू ,संस्था, आस्थापना ,कंपन्या विकून सगळ उध्वस्त करायचं काम सुरु आहे त्याची एकत्रित संगती कुणाला लागते हे का ?
या विषयावर मत मांडताना कृपया भाषेची पातळी दोन्हीबाजूने सांभाळणे अपेक्षित आहे हि नम्र विनंती.
-आनंद शितोळे
0 टिप्पण्या