Top Post Ad

आर्यन खान प्रकरणाला नवे वळण, पंच प्रभाकर सैल यांनी केला मोठी डिलींग झाल्याचा आरोप

आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रूपये मागितले गेले पण १८ कोटीवर ही डील फायनल झाल्याचे सांगत त्यातील ८ कोटी रूपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना दिले जाणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट १८ व्या नंबरचा पंच प्रभाकर सैल  यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नोटरीवर प्रतिज्ञापत्रक देत केला. तसेच आपल्या जीवाला वानखेडे यांच्यापासून धोका असल्याची भीतीही व्यक्‍त केली. आर्यन खान अंमली पदार्थ केसमधील एक पंच आणि संशयाच्या  भोवऱ्यात अंसलेला के.पी.गोसावी याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर सैल यांने आज एका व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे या प्रकरणी गौप्यस्फोट करत अनेक आरोप केले. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर तानखेडे यांच्यासह एनसीबीची संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. 

 

सैल यांच्या प्रसारीत झालेल्या व्हिडिओतील माहितीनुसार तो त्याच्या घरातील वैयक्‍तीक कारणामुळे तो आर्यन खान प्रकरणातील पंच के.पी. गोसावी याच्याकडे ठाणे येथे रहायला गेला. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ठाणे येथून गोसावी आणि सैल हे वाशी येथीलं सेक्टर-१६ येथे रहावयास गेले. त्यानंतर गोसावी हा गुजरातला गेला. तेथून परतताना गोसावी याने सैल याला फोन केला. त्यानंतर त्यास सीएसटी येथे बोलावले. तेथून त्याला व्हॉट्सअपद्वारे लोकेशन पाठवित एनसीबी कार्यालयाजवळ बोलावले. तेथून ते दिवसभर सोबत राहीले. त्यानंतर संध्याकाळी रेडसाठी सोबत चर्चगेट येथे नेण्यात आले. मात्र त्याला सुरुवातीला गेटवरच थांवविण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्याच्या फोनवर काही फोटो पाठवून यातील काही जणांना ओळखतोस का अशी विचारणा केली. त्यावर त्यातील एका फोटोतील मुलाला ओळखल्याचे त्यांने सांगत तो आर्यन खान असल्याचे गोसावी यास सांगितले.

 त्यानंतर गोसावी हा पुन्हा बाहेर आला. त्याने कपडे बदलले आणि गोसावी सोबत आत गेल्याचे त्याने सांगितले. तेथे आत गेल्यानंतर आर्यन खान याला एका केबिनमध्ये बसविण्यात आले. तेथून ते काही देळानंतर त्या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले. काही कालावधीनंतर गोसावी सोबत आपण लोअर परेल येथे गेलो. तेथे पोहोचल्यानंतर त्या गाडीच्या मागे दुसरी एक गाडी येवून उभी राहीली. त्यामागे निळ्या रंगाची मर्सिडेज बेंज उभी राहीली. त्यात शाहरूख खान याची मॅनेजर होती. त्या गाडीत गोसाठी हे ही जावून बसले. त्यानंतर त्यांच्यात मिटींग झाली. त्या मिटींगमध्ये काय झाले हे मला कळाले नाही. मात्र त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर गाडीमध्ये गोसावी हा कोणाशी तरी बोलत होता. त्यावेळी २५ कोटी सोडून द्या १८ कोटीला डील करा असे सांगत त्यातले ८ कोटी रूपये समीर वानखेडे यांना जाणार असून राहीलेले १० कोटी आपल्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत असे सांगत असल्याचे ऐकल्याचे सैल याने सांगितले.

त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर गोसावी याने आपल्या रूममधून मला फोन केला आणि आता लगेच तु मुंबई सेंट्रल येथे जा एक गाडी येईल तुला बँग देईल ती घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार मी ताडदेव येथे गेलो तिथे गेल्याठर एक गाडी आली त्या गाडीतून एकाने मला एक बॅग दिली. ती घेवून मी पुन्हा घरी आलो. आल्यानंतर गोसावी याने सगळे कपडे भरले आणि तो त्याच्या गाडीने पुन्हा गेला. एक-दोन दिवसानंतर त्याने पुन्हा फोन करत मला वाशीतील इनॉरबीट मॉल येथे बोलावले. तेथे त्याने मला त्याच्या गाडीत बसविले आणि एक पिशवी दिली. ती पिशवी घेवून मला चर्चगेट येथे जाण्यास सांगितले. तसेच ही पिशवी डिसूझाला देण्यास सांगितले. तसेच डिसूझा तुला फोन करेल असे सांगितले. 

त्यानुसार मी चर्चगेटला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर डिसूझाने मला ओबेरॉय हॉटेल येथे मला बोलाविले. तिथे गेल्यावर त्याच्याकडे ती पिशवी दिली. त्यानंतर त्या पैशातील सर्व पैसे त्याने मोजले त्यावर तो हे तर फक्त ३८ लाख असल्याचे सांगितले. त्यावर मी गोसावी ला फोन करा मला माहित नाही असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांमध्ये फोनवरून बोलणे झाले. त्यावेळी गोसावी याने दोन दिवसात बाकिचे अॅडजस्ट करतो असे सांगितले. त्यानंतर मी तेथून निघाल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा गोसावी हा गायब झाल्याने माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्हिडिओद्रारे ही माहिती प्रसारीत करत असल्याचे त्याने स्पष्ट करत मला समीर वानखेडे यांच्यापासून धोका असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान या गौप्यस्फोटानंत्तर जवळपास एनसींबीने दिवसभरात तीनवेळा पत्रकार परिषदांच्या वेळा जाहिर केल्या. मात्र दुपारनंतर या आरोपांचे खंडण करत असल्यांचे एक पत्रक जाहिर केले. या पत्रकान्वये एनसीबीने स्पष्ट केले की आर्यन खान डृंग्ज प्रकरण सध्या न्यायालयाच्या समोर असून त्यावर सध्या सुणातनी सुरू आहे. तसेच या प्रकरणातील प्रभाकर सैल यांना जर काही म्हणणे मांडवयाचे होते तर त्यांनी सोशल मिडीयाच्याऐवजी न्यायालयात आपलं म्हणण मांडायला हवे असे स्पष्ठ केले. याशिवाय प्रभाकर सैल यांनी काही व्यक्‍तींची नावे घेत त्यांच्यावर काहीं आरोप केलेआहेत. प्रभाकर सैल यांनी केलेले सर्व आरोप एनसीबींचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे ओळींने फेटाळत असल्याचे स्पष्ट करतं त्यानें केलेल्या काही आरोपांची चौकशी-तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञा पत्र एनसीबींच्या डायरेक्टरकड़े पाठवून देत असून त्यावर योग्य ती कारताई करावी असे पत्रकात नमूद केले. 

आर्यन खान ड्ग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवार्ईवर मोठे प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड प्रमाणात सुरु आहे. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स यांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून  महाराष्ट्राची बदनामी करण्याचा  सुनियोजीत कट असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्या सुद्धा याच कटाचा भाग आहेत, अशी  शंका लोकांच्या मनात निर्माण झाल्याचे ते म्हणाले.  



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com