डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच (महा.) रत्नागिरी शाखा चंद्रपूर च्या वतीने राबविण्यात आलेल्या दोन दिवसीय भव्य राज्यस्तरीय चारोळी लेखन स्पर्धेला २२४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिसाद आहे. DBA साहित्यिक विचारमंच (महा.) शाखा चंद्रपूर च्या वतीने घेण्यात आलेली ही तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन मा. भावना खोब्रागडे व मा. मनोज जाधव सर (संस्थापक/अध्यक्ष) व चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी ह्यांनी केले होते. ह्या स्पर्धेचे परीक्षण मा. नरेंद्र अनंत पवार डोंबिवली ठाणे जिल्हाध्यक्ष DBA साहित्यिक विचारमंच यांनी उत्तमरित्या केले आहे. या स्पर्धेत सौ. भाग्यश्री निलेश ननिर-नागपूर व पुनम सुलाने हैद्राबाद ह्या सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत. तर माला मेश्राम ठाणे, सिद्धार्थ सुधिर आंबेकर रत्नागिरी सुरेश शंकर सरवदे सांगली व रोहित विलास साळवे चिंचवड हे उत्कृष्ट ठरलेले आहेत. तरेच डाॅ. ॲड. संतोष दे. सावंत मुंबई, संतोष पहुरकर नांदेड, सुरेश पुंडलिक गेडाम चंद्रपूर, मुकेश देवराव नागदेवते चंद्रपूर व वैशाली गायकवाड खंडारे औरंगाबाद हे प्रथम आले आहेत. तर द्वितीय मध्ये आशुतोष जाधव रत्नागिरी , सौ. सुशिला संकलेचा नाशिक, सौ. लता आरेकर इचलकरंजी, संदिप भुक्कन पाटील, सौ. सारिका सोनजे नाशिक व अरुण गवई बुलढाणा हे आले आहेत.
तसेच तृतिय मध्ये मंगेश गंगाधर सावंत बीड, सौ. संगिता मालेकर चंद्रपूर, मधुकर गायकवाड रायगड, सौ. स्वाती कोरगावकर कोल्हापूर, सौ. विद्या सूरज साबळे सोलापूर व कु. अंजना गिरिधर बारीक बालेश्वर हे आले आहेत. उत्तेजनार्थ मध्ये अंजूम अकिल शेख वडधा, उमा उके गर्भरेशमी गोंदिया, वर्षा फटकाळे वराडे ठाणे, महादेव तांबे रत्नागिरी, निर्मला जीवने मागपूर, प्रणित जमनादास झाडे चंद्रपूर व सुभाष मानवटकर नागपूर हे आले आहेत. तर लक्षवेधी मध्ये गौरी बाळासाहेब राजगुरु, सौ. वासंती राजेंद्र बोराडे रायगड, सौ. शारदा अरुण गणोरकर अमरावती, प्रा. भारत एम. झाडे चंद्रपूर, संदिप सुरेश सावंत सिंधूदुर्ग यांचे क्रमांक आले आहेत. तसेच भावस्पर्शी मध्ये भुषण जगन भगत, ॲड.शुभांगी प्र. अडगोकर अमरावती, गणेश यशवंत घोडके अहमदनगर, सौ. शामल अविनाश कामत डोंबिवली व कविता काळे हे आहेत.
0 टिप्पण्या