Top Post Ad

दोन दिवसातच डोंबिवलीच्या नव्या कोपर पुलावर खड्डा

  डोंबिवली- येथील पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुलावर लोकार्पण करून ४८ तास उलटत नाहीत तोवर लगेच खड्डा पडल्याने पुलाच्या कामात किती टक्केवारी वाटल्या गेली असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. ७ सप्टेंबर रोजी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे लोकार्पण करत सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र लोकार्पणाला दोन दिवस उलटत नाहीत तोच या पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पुलावर पडलेला खड्डा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शहरातील रस्ते आधीच खड्ड्यांनी पोखरले असतांना नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलावर देखील खड्डा पडल्याने नागरिकांनी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. टक्केवारीच्या खड्यात सर्व सामान्य जनता भरडली जाणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला निकृष्ट कामासाठी लक्ष्य केले आहे. मात्र केडीएमसीने गुरुवारी तातडीनेखड्डे भरण्याचे काम केले.  नंतर एक निवेदन जारी करून दावा केला की हा पूल एक वर्ष आणि चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे, परंतु सततच्या पावसामुळे ते रस्त्यावर मस्तकी डांबर वापरू शकले नाहीत, परिणामी खड्डे पडले.  केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पावसाळा संपल्यानंतर  डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

ज्यांनी दोन दिवसांपूर्वी या पुलाचे उद्घाटन केले अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना  दुसऱ्यांदा अशा लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.  गेल्या महिन्यात त्यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचे अशाच प्रकारे उद्घाटन केले होते.  काही दिवसांतच, रस्त्याच्या निसरड्या पृष्ठभागामुळे अपघात झाले आणि ते दुरुस्तीसाठी अंशतः बंद करावे लागले.  आता, नवीन कोपर पुलावरील खड्डा स्थानिक अधिकारी आणि तो बांधणाऱ्या कंत्राटदाराकडून जबाबदारीचा पूर्ण अभाव दर्शवितो. यापुढे तरी अशा कामांची उद्घाटने मुख्यमंत्र्यांनी करू नये असा सल्ला अनेक नेटकऱ्यांनी दिला. 

 डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ७ सप्टेंबर रोजी झाला.  या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रविंद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोपर पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. कोपर पुलाला समांतर आणखी एक अतिरिक्त पुल करण्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com