Top Post Ad

गणपति मोर्या

 

   लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्र पती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मध्ये गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गण पती म्हणत. या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले. आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेऊया...

काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी खर्‍या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला. बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत. पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे. चित्त आणि मल्ल. चित्त म्हणजे शरीर,   मल्ल म्हणजे मळ. तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दु;खा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे. पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला. तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे. याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!! उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??

जगामध्ये दु:ख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दु:ख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दु:ख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दु:खा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला. म्हणजे दु:खाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत.  मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले. बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे. मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुखहर्ता होऊ शकतो काय...???

काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करुन दु:खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही. मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...? बुद्धाने दु:ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत. मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपती हा दुसरातिसरा कोणी नसून बुद्धच आहे...! पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवुन बुद्धाचे अस्तित्वच नष्ट केले आणि देवांची निर्मिती करुन स्वत:ला देवासमान मानून स्वत्:चे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले..

  पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी "गणपती बाप्पा मोर्या" अशा घोषणा दिल्या. मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामधे संभ्रम आहे....!!! कर्नाटक मध्ये चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वत:च्या नावापुढे मोर्या शब्द लावायचे. महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!! १४ व्या शतकात एक मोर्या गोसावीच्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली. ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्यानंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरु केले. कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामायेलाच ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले. जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले. शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले. कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता.

पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले, त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुन समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला. आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि  सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुन ब्राह्मण धन दौलत मिळवतात. प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो. 

  • - प्रबोधनकार ठाकरे
  •     सन: ७/२/१९५८
हे पण वाचा....
------------------------

   आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणार्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धान्ना एका विशीष्ट समाजाच्या चौकटीत अडकउन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?      बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य ...गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !

१ ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गोतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .
२ ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते 
३ )  तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गोतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .
४ ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातिल बुद्धीस्ट राजे होते .
५ ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदीवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदीवासी समाजाची लोक  रावणदहन करत नाहीत  . तर तिथ रावणाची आमचा आदीपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखण्ड राज्यातील आदीवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.

बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेत देत बुद्धीप्रामाण्यवादी , विद्न्यानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केल. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत " सोनेकी चिडीया " म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथ एका वेळी जगातिल 60000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणी विकसीत होता याची आपल्याला प्रचिती येइल !

बुद्ध काळ हा 800 वर्ष्याचा ! सम्राट चंद्रगुप्त हा मौर्य हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच  सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने हत्या केली आणी बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगीरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परम्परांची निर्मिती झाली . ह्या गोष्टीन्ना फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराया , छ.शिवाजी महाराज , छ.सम्भाजी महाराज ...महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणी सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांनी केलेले आहे .
ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची " विश्वाचे निर्माते " ( Makers Of The Universe )  म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती .... १) तथागत गोतम बुद्ध  २) वर्धमान महावीर  ३) प्रियदर्शी सम्राट अशोक  ४) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!

    आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे .ज्या ज्या देशान्नी बुद्ध स्विकारला ..ते ते देश आज प्रगतिच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणी आम्हीही कधी बुद्धाला समजुनच घेतल नाही . जगाला शांतीचा आणी क्रांतीचा संदेश देण्यार्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम !

हे पण वाचा......


गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गजाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.  दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही एकमेव गणपतिची मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे.  आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे.  मानवी रुपात असल्यामुळे याला आदी गणपति संबोधले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com