Top Post Ad

मुंबई मिळवण्यासाठी जे हुतात्म्यांनी स्वत:चं रक्‍त सांडलं ते वाया जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री

 
     अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. या दिवशी आज या चांगल्या कामाची सुरुवात होत आहे.  हे चाळीतलं आयुष्य तुम्ही जगलात, आता तुम्हाला स्वत:च्या हक्काचं घर मिळतं आहे. हे घर मिळाल्यानंतर ही मुंबई मिळवण्यासाठी जे हुतात्म्यांनी स्वत:चं रक्‍त सांडलं ते वाया जाऊ देऊ नका. स्वत:च्या हक्काचं घर झाल्यानंतर कोणत्याही भुलथापांना बळी पडून आपले घर विकू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बी.डी.डी. चाळवासियांना केले.  

   बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुमारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक सरकार यायचं आम्ही तुम्हाला घरं देऊ असं आश्वासन द्यायचं, तुम्ही त्या स्वप्नात रममाण होऊन मतं देत आलात, पाठिंबा देत आलात. हा क्षण आपल्या आयुष्यात कधी उजाडेल याचा विचार तुम्ही केला नसेल, पण आज हा क्षण तुमच्या आशीर्वादाने  उजाडलेला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ज्या बीडीडी चाळींत माझे येणे-जाणे होते. कवी, कलाकार, क्रांतिकारक ज्या चाळींनी दिले. त्या बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचा शुभारंभ माझ्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून भूमिपूजनाने होईल, हे स्वप्न मी कधीही पाहिले नव्हते असे सांगत या बीडीडी चाळींचे महाराष्ट्रावर खूप रुण आहे ते कधीही फिटू शकणार नाही. त्यांचे आम्ही देणे लागतो, तेव्हा या बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या घरांचे स्वप्न वेगाने पूर्ण करणार आणि त्यावेळी अशाच व्यासपीठावर आम्ही सर्व एकत्र असणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी मराठी मुंबईचा सूर लावला. 'पुनर्विकासानंतर घरं विकू नका. इथल्या भागातला मराठी टक्का घालवू नका,' असं आवाहन बीडीडी चाळीतील तमाम रहिवाशांना केलं. शरद पवार यांनी आपल्या भाषणात बीडीडी चाळीची संस्कृती, मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आठवणी जागवल्या. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, कॉ. शाहीर अमरशेख, मास्टर भगवान, सुनील गावसकर, पु. ल. देशपांडे यांचं या गिरणगावाच्या परिसरामध्ये वास्तव्य होतं. इतिहास निर्माण करणारे लोक इथं निर्माण झाले. काळानुसार या चाळींमध्ये बदल केले पाहिजेत, इथल्या लोकांना अधिक सुविधा द्यायला पाहिजे, मालकी हक्क दिला पाहिजे. आताच्या प्रकल्पामुळं हे होणार आहे. उद्या इथं २० मजली, ३० मजली इमारती उभ्या राहतील. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरं मिळतील. पण या इमारतींमधून इथला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. ही प्रॉपर्टी, तुमच्या कष्टाचा ठेवा, तुम्ही विकू नका. अधिक सवलतींच्या जागा पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवा. इथल्या भागातला मराठी टक्का घालवू नका. मराठी आवाज दिसला पाहिजे, टिकला पाहिजे. ती खबरदारी घ्या,' अशी जाहीर विनंती शरद पवारांनी यावेळी केली.

 'अलीकडं महाराष्ट्रावर सतत काहीना काही संकटं येत आहेत. अतिवृष्टीचं संकट मोठं आहे. या संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. एकीकडं पूरग्रस्तांची घरं बांधण्याचं आव्हान तर दुसऱ्या बाजूस शंभर वर्षे मुंबईत कष्ट करून देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं जातंय हे ऐतिहासिक आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे,' अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा गौरव केला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com