पूर्वीप्रमाणेच उपहारगृह ५० टक्के क्षमतेनं ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. ठाणे महापालिकेनंही यामध्ये कोणताच बदल केलेला नाही. शासनाच्या निर्णयामुळे उपहारगृह व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. यामुळं आता उपहारगृह व्यावसायिकही एकत्र आले असून या निर्णयाविरूध्द मूक मोर्चा काढला जाणार होता. मात्र जमावबंदी आदेश लागू असल्यामुळं हा मोर्चा रद्द करण्यात आला. पण याबाबत सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास उपहारगृह व्यावसायिकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. राज्य शासनानं उपहारगृह व्यावसायिकांना दुपारनंतर रात्री १० किंवा रात्री १२ वाजेपर्यंत उपहारगृह सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी असा इशारा उपहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेनं दिला आहे.
0 टिप्पण्या