Top Post Ad

५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्‍त पदांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

   कोरोंना महामारीचा होत असलेला प्रादुर्भाव अद्यापही कमी होत नसल्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्‍त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्पात येत असल्याची घोषणा राज्य निवडणुक आयुक्‍त यू. पी. एस. मदान यांनी केली.  पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या रिक्‍त झालेल्या जागांसाठी पुन्हा पोट निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यामुळे अखेर राज्य सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगावर सोपविला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने या पोंटनिवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहिर केले.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम-आणि नागपुर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणुक विभाग-आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२९ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२५९ रोजी राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर पा पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोंगाला केली होती असे त्यांनी सांगितले. सर्तोच्च न्यायालयाचे ६ जुले २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणुक आयोगाने राज्य शासनाकडून कोविडबाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्पावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिंवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिधिल करण्यात आली आहे. कोविडची परिस्थिती सुधारल्यातर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com