दिल्ली प्रदेशचे समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते सदर भूमिपूजन होणार असून यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ तथा राजकीय विश्लेषक मा.डॉ.सुरेश माने, मारवाडी महासभेची सभापती लोकमित्र महेश्री, सिने अभिनेते गगन मालिक, तसेच समाजसेवक अशोक गर्ग, उद्योगपती नानजीभाई खिमजीभाई ठक्कर, राजकुमार सैनि, रामस्वरुप डांगरा, महेंद्र जैन, किशोर खत्री, समाजसेवक हिरालाल भोईर, सुरेश खेडेपाटील, प्रमोद इंगळे, चंद्रभान आझाद आणि भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टविषयी....
20 जानेवारी 9९९८ रीजी विपश्यना आचार्य कल्याणमित्र सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी भिक्खू आचार्य संघाची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनास्त्राली विपश्यना साधना केंद्र आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी गोयंका गुरुजी यांनी भिक्खूसंद्याला विनम्र सूचना केली. त्यांच्या सुचनेचा आदर करून भदन्त विनयबोधि महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च 9९९८ रीजी दिपंकर विपश्यना मेमोरिअल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ट्रस्टच्या माध्यमातून बिपश्यना केंद्र आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यासाठी सन् 2००० मध्ये ठाणे जिल्ह्यातील वासिंद रेल्वे स्टेशन जवळ मौजे कासने या ठिकाणी साडेचार एकर जमिन विकत घेण्यात आली. या धम्मभूमीवर भिक्खू निवास, नागार्जुन प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखाना), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि शांतिस्तुपाचे बांधकाम सुरु करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य युतळा बसविण्यात आला. तसेच डॅलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर देखील बसवण्यात आले.
मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर असून व्याचाराचे मोठे केंद्र आहे. मुंबई भारत देशाची आर्थिक राजधानी असून जगातील अनेक धम्म बांधब तथागत भगवान बुद्धांचा धम्म समजुन घेण्यासाठी उत्सूक आहेत. मुंबई शहराचासून ७० कि-मी-अंतरावर नाशिक (नॅशनल हायवे) रोडवर या भव्य वास्तूची निर्मिती होत आहे. आपल्या समाजाचा सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक स्तर उंचावण्याकरिता, धम्म उद्देशाच्या पुर्ततेकरिता आपणा सर्वांची जबाबदारी असून तन-मन-धनाने सहकार्य करावे. आपल्याला विनंती करण्यात येत आहे की, आपण साधना केंद्र आणि धम्मराजिक महाविहाराला स्वतः भेट देऊन प्रत्यक्ष सत्याची पडताळणी करावी.
0 टिप्पण्या