
प्रमुख शहरातील महानगर पालिकांची अंतिम मुदत : मुंबई -७ मार्च २०२२, अमरावती -६ मार्च २०२२, सोलापूर -७ मार्च २०२२. नाशिक -१४ मार्च २०२२. पिंपरी-चिंचवड - १३ मार्च २०२२, ठाणे - ५ मार्च २०२२. पुणे - १४ मार्च २०२२. अकोला - ८ मार्च २०२२. नागपूर - ४ मार्च २०२२. उल्हासनगर - ४ मार्च २०२२. :औरंगाबाद -१८ एप्रिल २०२०, नवी मुंबई - ८ मे २०२०, वसई -विरार - २७ जून २०२०. कोल्हापूर - १५ नोव्हेंबर २०२०.
दरम्यान औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह ६५ नगरपालिका आणि नगर परिषदांच्या कोरोना साथीमुळे प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्याची माहीती सुत्रांकडून मिळत आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून प्रलंबित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात तर महापालिकांच्या निवडणुका का घेण्यात येत नाहीत, असा सवाल या याचिकांद्वारे करण्यात आला आहे. मात्र महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे समजते.
0 टिप्पण्या