![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHFWXo20YcJbExDVK3ruItSdwc8eRM_jcpW2Qv9sv5s3iLft0DDawKiS0G1TRosjbDKdYcncmKCRUzyKd-pVkg3x4pQlCnbqSalLO2vc5_IrMvSjXPxa7PozEqcwWbE5q0sFkLRxuXqVo/s320/14541.jpeg)
डॉ.माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या अनुसुचित जाती जमाती आरक्षण मंत्री गट समिती चे एससी सदस्यांनी समितीचे राजिनामे द्यायला हवेत, त्यांना विचारले जात नसेल आणि गृहीत धरून अजीत पवार परस्पर पदोन्नती रद्द करण्याची जी आर काढतात तर तूम्ही पदावर राहताच कशाला असा ही सवाल त्यांनी उपस्थित केला, मराठा आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा संशोधनात्मक इतिहास सांगून मोठ्या प्रमाणात होणार्या शेतकरी आत्महत्या त्यांची कारणे, मराठा आरक्षणाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन कायदेतज्ज्ञ डॉ.सुरेश माने यांनी केले,
ओबीसी नेते धनाजी सुरोसे नवनिर्माण बहुजन फोरमचा उद्देश सांगताना यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजामध्ये आपला हक्क आणि मौलिक अधिकार या बाबत मोठी उदासिनता दिसून येते, हि जनजागृती करण्यासाठी फोरमच्या माध्यमातून ओबीसी एससी एसटी मायनोरिटी भटक्या विमुक्त समाजाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे,गेली दहा पंधरा वर्षांपासून ठाणे शहरातील फूले शाहू डॉ आंबेडकरी चळवळीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे,नविन तरुणांना पुढे आणले पाहिजे, चळवळीतील कार्यकर्ते चळवळीला पोषक नसलेल्या राजकीय पुढार्यांच्या मागे वेळ वाया घालवत आहेत, बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून भविष्यातील सामाजिक, राजकीय घडामोडीतून बहुजन चळवळीच्या हातात काही चांगलं यश यायला हवे, त्यासाठी हा फोरम काम करणार आहे,
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4cMaYR_ByhazhST1rO74Pj3i09O3ggWzWXZ-9GUN6ncVSrwqz4jrZelSDXt04FdAA5tzP_nqHGhu80NUf49kfz8brTMdmFmmcTkUvYtglY15C69-677nncuC56TGUTMT3azxFCy1jglI/s320/14542.jpeg)
0 टिप्पण्या