![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4Js1Cpsab1Lwj5yFVYvhQD8jRiN1lNwnhvWD9jnnySlZXRjKs3z0kT7nzowvcrWFLH311DPvifjUBgd8vEQ7OB_jhCQ5sX-2bijjH3rTtb4QBS2rYq4MhGXCqnCsOkBzAsqRsQSCEEZ4/w200-h186/lockdoun8754.jpg)
कोल्हापूरमधील व्यापारीवर्ग आपली दुकाने उघडी ठेवणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरमध्येही व्यापारी संघटनांनी आक्रमक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. आजपासून बाजारपेठा हे ४ वाजेपर्यंतच खुल्या असणार आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग प्रचंड संतापला आहे. नागपूरमध्ये महापालिका व जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा खुल्या ठेवण्यासंबंधी नव्याने नियमावली जारी केली आहे. यानुसार आता पुन्हा एकदा सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शहरातील निर्बंध काहीच दिवसांपूर्वी शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठा रात्री ८ तर हॉटेले-रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान, हॉटेलमधून पार्सल सुविधा दुपारी ४ वाजेनंतरही सुरू राहणार आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लसचा धोका वाढू लागलाय. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे, दुसरी लाट पुन्हा उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील,' दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता 'पुढच्यास ठेस, मागचा शहाणा' या म्हणीप्रमाणं आपल्याला आधीच काळजी घ्यावी लागेल,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. मालाड इथल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'सध्या आपल्याकडं कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.
0 टिप्पण्या