
पोलिस नाईक प्रकाश भालेराव यांनी काही विचारण्याआधीच तिने रडत रडत कृपा करून मदत करा, मी हात जोडते, अशी विनंती केली. भालेराव यांनी तिला न घाबरता बोल, असे म्हणत विश्वास दिला. तेव्हा तिने तिची कर्मकहाणी सांगितले. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मात्र, कोरोनामुळे घरकाम बंद झाले. नंतर मिळेल ते काम करून तिने कसाबसा उदरनिर्वाह चालवला. मात्र, मागील काही दिवसांपासून किराणा सामानासाठीही तिच्याकडे पैसे उरले नाही.
यावेळी बंदोबस्तावर उपनिरीक्षक अवचार, सहायक फौजदार हिवराळे, सुरेश भिसे व इतर नऊ कर्मचारी होते. भालेरावांनी तत्काळ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना कल्पना दिली. त्यांनी तिला सर्वतोपरी मदत करा, असे सांगत नाकेबंदीतून काही जणांना सूट दिली. मग भालेराव आणि इतरांनी वर्गणी करत पंचेचाळीस किलो किराणा सामान घेऊन तिला दिले. गिरी यांच्या सूचनेवरून तिला रिक्षातून हिनानगरातील घरीही नेऊन सोडले.
0 टिप्पण्या