Top Post Ad

ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागातील प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात भीषण आग

:

 ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. . या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका मीटरमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर ही आग संपूर्ण रुग्णालयात पसरली. काही वेळातचं आगीनं रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ उसळत होते. ही आग आयसीयूपर्यंत गेली होती. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे आयसीयूमधील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करत असताना चार रुग्ण दगावल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

 बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.  यास्मीन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47) हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. रुग्णालयात एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर रुग्णांना ठाण्यातील इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे

 या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटातच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करुन मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.  

या संदर्भात त्यांनी सांगितले की,  पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. एकंदर 20 रुग्ण होते. त्यातील 4 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी  केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये  दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली? याची चौकशी  ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन अभिप्राय देतील.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com