Top Post Ad

ठाण्यातील सिडको ते महागिरी पर्यंतचा खाडी किनारा कुणी गायब केला


  ठाणे शहराला सुमारे 32 किमीचा खाडी किनारा लाभला आहे. सध्या सुरु असलेल्या मेट्रोच्या कामातील मातीचे मोठ मोठे डंपर  खाडी किनारी रिकामे केले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कांदळवनांची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. खाडी किनारी भराव टाकून त्याचा वापर करण्यात येत आहे. याबाबत सातत्याने वर्तमानपत्रातून बातम्या येत असतात. मात्र ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाने प्रचंड भराव टाकून स्टेशन लगतच्या चेदणी कोळीवाडा  सिडको परिसरातील खाडी किनाऱयाला नाल्याचे स्वरुप दिले असल्याची बाब मात्र धक्कादायक आहे. हा खाडीकिनारा ठाणे महानगर पालिकेने जोशि बेडेकर महाविद्यालाला आंदण दिला असल्याची बाब येथील नागरिक नेहमीच बोलत असतात.  महाविद्यालयाचा पसरा केवळ समोरूनच नाही तर मागील बाजूने देखील प्रचंड वाढत आहे. मागील बाजूने खाडीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पुढील  बाजूने सिडको बस स्टॉप येथून सुरु झालेला महाविद्यालयाचा पसारा अगदी चेंदणी कोळीवाडा ते महागिरी कोळीवाडा पर्यंत वाढतच चालला आहे.  याबाबत ठाणे महानगर पालिका प्रशासनाने चौकशी करून या महाविद्यालयाला देण्यात आलेला भूखंड आणि आज वापरत असलेला भूखंड याची तात्काळ चौकशी करण्याची गरज येथील अनेक नागरिकांनी व्यक्त करतात.

 कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात ठाणे महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या शाखांच्या मिळून सहा ते सात इमारती अल्सताना देखील एकाही इमारतीत क्वारंटाईन सेन्टर उभारण्यास नकार दिला होता. एखाद्या इमारतीत क्वारंटाईन सेंटर झालं असतं तर जवळच्या नागरिकांची सोय करता आली असती.  इतकेच नव्हे तर याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाने कोर्टात धाव घेतली होती. ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेले हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कोणता राजकीय वरदहस्त आहे. ज्यांच्या बळावर या महाविद्यालयाने ठाणे महानगर पालिकेचे सामान इमारतीतून  बाहेर काढले. असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. 

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात भूमाफियांनी प्रचंड साम्राज्य निर्माण केले आहे. अनेक ठिकाणच्या खाडी किनारी बेकायदेशीरपणे रॅबीटचा भराव करण्यात आला आहे. तसेच कांदळवनाचीही कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. तसेच यामुळे परिसरातील मलवाहिन्या आणि गटारांचे पाणी सर्रास खाडीत सोडले जात आहे.   त्यामुळे आधीच दूषित असलेले खाडीचे पाणी आणखीन दूषित होऊ लागले आहे. म्हणूनच  पावसाळ्यात या ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ठाण्यातील या बड्या प्रस्थ असलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या एकूणच जागेविषयी आणि इमारतींविषयी ठाणे महानगर पालिकाच नव्हे तर एकूणच जिल्हा प्रशासन मुग गिळून गप्प असल्याची चर्चा नेहमीच ठाण्यात होत असते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com