Top Post Ad

निवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला

निवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला



मुंबई


विधानसभा निवडणूक २०१९ च्या वेळी भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे कंत्राट हे एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला दिले. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  इतकेच नव्हे तर तो पदाधिकारी भाजपच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. म्हणूनच आपण या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे २४ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु या प्रकारावरून असे स्पष्ट दिसून येते की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. उपरोक्त घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे असे चव्हाण म्हणाले.




विद्यमान भाजपने महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचं समोर येतं. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येत असल्याचे चव्हाण म्हणाले.

 

 


दरम्यान, निवडणूक आयोग – भाजप यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम भाजपच्या आयटी सेलच्या कंपनीला देण्यात आले होते. त्याचा भंडाफोड करणाऱ्या व्यक्तीच्या घरी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी काल २४ जुलै रोजी धडक दिली. माहीती कार्यकर्ते साकेत गोखले राहात असलेल्या ठाण्यातील परिसरात जाऊन 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्यांचा व्हिडीओ साकेत गोखले यांनी चित्रीत करून तो ट्विटरवरून जाहीर केला. 'आरएसएसचे कार्यकर्ते माझ्या घराबाहेर 'जय श्रीराम' घोषणाबाजी करीत आहेत. ते माझ्या आईला धमकी देत आहेत. तातडीच्या मदतीची विनंती आहे' असा मेसेज लिहून गोखले यांनी अनिल देशमुख आणि ठाणे पोलिसांना टॅग केले आहे. गोखले यांच्या या संदेशाची गृहमंत्री देशमुख यांनी तातडीने दखल घेतली. आम्ही या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिल्याचे देशमुख यांनी गोखले यांना प्रत्युत्तर दिले.



 

 

 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com