Top Post Ad

कोविड-19, लॉकडाऊन आणि बहुजन संग्रामचे अनमोल कार्य 

कोविड-19, लॉकडाऊन आणि बहुजन संग्रामचे अनमोल कार्य 


- सुबोध शाक्यरत्न -


आज संपुर्ण भारत कोरोणा व्हायरसच्या प्रभावाने व्यथित झाला आहे. देशात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन सुरू आहे. दिवसागणिक रुग्णांची वाढ होत आहे. हे सगळं कधी थांबेल आणि पुन्हा जनजीवन कधी सुरळीत होईल याचा काही नेम नाही.  जर डिस्टन्स आणि मास्कचा व्यवस्थित वापर झाला नाही तर कदाचित पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जाण्याचा सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मागच्या भाषणात केला आहे.  या सर्व काळात रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार आणि आदिवासी बांधवांचे जगणे असह्य झाले आहे. याचा सर्वाधिक फटका यांनाच बसला. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. अशा विवंचनेत, कंत्राटी कामगार, मजूर, आणि खेड्यापाड्यात असलेला आदिवासी सापडला आहे. जीवनाचा गाढा रोज कसा हाकायचा यातून मार्ग काढत असतानाच हे नैसर्गिक संकट आले. मात्र या सर्वांना बहुजन संग्राम या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिल्याने अनेक कुटुंबाच्या चेहऱयावर हास्य फुलले आहे.   
संपुर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या सामाजिक, विधायक व कार्यतत्पर संघटनेने आपल्या कार्यक्षेत्राचा व्यापक दृष्टीकोन ठेवूनच या संस्थेने कोरोनाच्या या संकट काळात हातावर पोट असलेल्या 5 हजार श्रमिक बांधवांसाठी शिधा वाटप करण्याचे उद्धीष्ठ डोळ्यासमोर ठेवले.  प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो गोडेतेल, 1 किलो साखर असे 12 किलो जीवनावश्यक वस्तू वाटप केले.  14 एप्रिल पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत गेल्या 3 आठवड्यात शिधा-किराणा वाटपाचे 3 टप्पे पार पडले असून आतापर्यंत 2800 गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महानगरातील कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगर, महात्मा फुले नगर या चाळी आणि तसेच उपनगरांच्या झोपडपट्यांच्या वसाहतीमधूनच नव्हे तर पालघर या आदिवासी बहूल जिल्ह्dयातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या अति दुर्गम भागात, पाडया-पाड्यातील कुटुंबापर्यंतही संस्थेने आपल्या मदतीचा हात दिला आहे. साक्षात देवदूतच अवतरला अशा शब्दांत आदिवासी बांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.  
   लॉकडाऊनची मुदत 31 मे पर्यंत असली तरी त्यानंतर लॉकडाऊन हटला वा कायम राहीला तरी परीस्थिती लगेचच पूर्वपदावर येईल अशातला भाग नाही. यापुढील काही काळ कोरोना सोबतच आपणांस काढावा लागेल पंतप्रधानांसह मुख्यमंत्रीही म्हणत आहेत.  यावरून पुढील काळातील परीस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱया काळात नाका कामगार, बांधकाम मजूर, मोलकरणी, निराधार महिला, परीत्यक्ता या घटकांना समाजातून पाठबळ मिळण्याची नितांत आवश्यकता आहे.   सारी भिस्त सरकारवर न टाकता स्वयंसेवी संघटना व सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी मदतीचा ओघ बंद पडू न देण्याची काळजी वाहावी लागणार आहे.  जूनमध्ये सुरू होणार्या पावसाळ्यात तर हातावर पोट असलेल्या वर्गाची रोजगाराअभावी अधिकच दैना होण्याचा धोका समोर उभा आहे. म्हणूनच  हाती घेतलेले मदत कार्य परीस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत म्हणजेच पावसाळा संपेपर्यंत सूरुच ठेवण्याचा निर्धार बहुजन संग्रामने केला आहे. त्यानुसार मदत कार्याचा चौथा टप्पा हा दिनांक 30 मे शनिवार रोजी पालघर या आदिवासी बहूल जिल्ह्dयातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी या अति दुर्गम भागातील उपासमार होत असलेल्या सुमारे बाराशे आदिवासींना प्रत्येकी 12 किलो शिधा - किराणा वाटप करण्यात येणार आहे.     
 पुढे पावसाचे दिवस आहेत आणि लॉकडाऊन वाढलाच तर काय करायचे? असा प्रश्न अद्यापही  कामगार, मोलमजुरी करणाऱयांसमोर आहे. संकट हे केवळ कमकुवत घटकांसाठीच असते. कोरोणाच्या दिवसातही तेच झाले. जे रोजंदारीवर काम करतात त्यांच्यासाठी हे संकट म्हणजे कहरच होता. मात्र भिमराव चिलगावकरांसारख्यांनी यावर मात करीत या गोरगरीब कष्टकऱयांना आधार दिला. पण हा आधार अजून काही काळ देण्याची गरज आहे. हे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे  पुढच्या काळात देणाऱयांचीच अधिक गरज भासणार आहे. यापुढेही ही मदत अशीच सूरू ठेवण्यासाठी, कोरोनाच्या जागतिक संकटात सापडलेल्या जनसामान्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून सढळ हाताने व उदार अंतकरणाने आधार देण्याच्या या सेवाभावी व विधायक उपक्रमाला दात्यांनी सहानुभूती पूर्वक हातभार लावून गोरगरीब समाजाला उपासमारीपासुन वाचवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी या कार्यास हातभार लावावा कळकळीचे आवाहन बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगांवकर यांनी केले आहे.   


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com