वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य प्रवास करत होतं. अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. दुचाकीला धडक देणारी कार शिवसेना उपनेते राजेश शहांची आहे. अपघात झाला त्यावेळी त्यांचा मुलगा मिहीर कार चालवत होता, अशी माहिती कावेरी यांच्या पतीनं जबाबात दिली आहे. राजेश शहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अपघातावेळी कार चालवत असलेला राजेश यांचा मुलगा मिहीर त्यांच्या बोरिवलीतील घरात राहतो. त्याला पालघरमध्ये फारसं कोणी ओळखत नाही. 'मिहीर कधीकधी पालघरमध्ये येतो. कुटुंबाच्या व्यवसायासाठी तो पालघरला येतो. अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांप्रमाणे तो राजकारणात फारसा सक्रिय नाही. पण तो वडिलांसोबत असतो.
गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्रात अशा चार घटना घडल्या आहेत. बेशिस्तपणे वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे आणि रस्ते अपघातांच्या घटनांमध्येही वाढ हे चिंताजनक आहे. बेभान होऊन सुसाट वाहन चालवण्याची जी वाढती प्रवृत्ती आहे, त्याला वेळीच लगाम घालणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांमध्ये निष्पाप जीव गमावणे हे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्धची मोहीम सरकारने अधिक मजबूत केली पाहिजे आणि वाहतूक नियम अधिक कठोर करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. हिट अँड रन , ड्रिंग अँड ड्राईव्ह प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन गुन्हेगार मुक्त होता कामा नये. कठोर कायदा करून अशा प्रवृत्तींना जरब बसवली पाहिजे अन्यथा धनदांडगे असेच बेदरकारपणे गाडीखाली लोकांना चिरडून मारतील व मोकट वावरतील अशी भितीही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
पालघरमधील एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भंगार व्यवसायावर शहाचं वर्चस्व आहे. याशिवाय ते बांधकाम साहित्यदेखील पुरवतात. व्यवस्थापन, संपर्क आणि वाटाघाटी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. . पालघर आणि आसपासच्या भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. एप्रिल २०२३ मध्ये शिंदेंनी शहांची उपनेतेपदी नियुक्ती केली. त्याआधी ते पालघर जिल्हाप्रमुख होते. शहा २००० सालाच्या आधीपासून राजकारणात सक्रिय होते. ठाणे आणि आसपासच्या भागात ते काम करत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदेंकडे ठाणे आणि पालघरची जबाबदारी सोपवली. त्यानंतर शहा आणि शिंदे एकमेकांच्या अधिक जवळ आले. पालघरमधला शिंदेंचा उजवा हात अशी शहांची ओळख आहे. पालघरमधील सगळ्याच समुदायांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत. परिसरातील सर्व कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. स्थानिक आयोजक मंडळांना कार्यक्रमासाठी भरपूर देणगी देतात. 'एप्रिल २०२३ मध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी कुंदन संखे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामागे संघटनात्मक कारणं होती. पण त्यांनी शहांची नियुक्ती पालघरच्या उपनेतेपदी केली.
0 टिप्पण्या