मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात उद्धव ठाकरे यांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. एका जागेवरचा विजय निसटला आहे. मुंबई-उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र पुन्हा फेरमोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांनी केली. यामध्ये केवळ ४८ मतांनी किर्तीकर यांचा पराभव झाला असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबई- पियूष गोयल, , मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील, मुंबई उत्तर मध्य- वर्षा गायकवाड, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याच मतदारसंघातून लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. यावेळी त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय मिळवता होता व देशात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार आले होते. आजच्या विजयाने २००४ च्या निकालाची पुनरावृत्ती केली आहे. एकनाथराव गायकवाड यांच्याप्रमाणेच वर्षा गायकवाड यांचाही दांडगा जनसंपर्क असून सर्वसामान्य जनतेसाठी त्या काम करत असतात. धारावीच्या आमदार या नात्याने वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धारावीकरांना विस्थापित करण्याच्या षडयंत्रालाही त्यांनी कडाडून विरोध करत संघर्ष करत आहेत. शिक्षण मंत्री या नात्यानेही त्यांनी चांगले काम केले आहे. आता संसदेत मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्या आवाज उठवतील व न्याय देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रशेखर, तुसी ग्रेट हो!
उत्तर प्रदेशात सुरुवातीला भीम आर्मी आणि नंतर आझाद समाज पार्टी स्थापन करणारे तरुण दलित नेते चंद्रशेखर आझाद यांनी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लोकसभेत मुसंडी मारली आहे. त्यांची ही नेत्रदीपक कामगिरी म्हणजे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेतृत्वालाच नव्हे तर उत्तर प्रदेशात मायावती यांनाही सणसणीत चपराक ठरली आहे. चंद्रशेखर यांनी नगिना लोकसभा मतदारसंघातून १ लाख ५२ हजारावर मतांची आघाडी घेऊन विजयश्री घेचून आणली आहे. त्यांनी एकूण ५ लाख ११ हजार ८१२ मते मिळवली आहेत. त्यांची एकूण मते, मतांची आघाडी आणि स्वबळावर मिळवलेल्या विजयाला सॅल्युट ठोकावाच लागेल! - दिवाकर शेजवळ (ज्येष्ठ पत्रकार)
ठाणे-नरेश म्हस्के, पालघर- हेमंत सावरा, भिवंडी- सुरेश म्हात्रे, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबई- पियूष गोयल, मुंबई-उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर, मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील, मुंबई उत्तर मध्य- वर्षा गायकवाड, रायगड- सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे, जळगाव- स्मिता वाघ, शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे, सांगली- विशाल पाटील, नागपूर- नितीन गडकरी, पुणे- मुरलीधर मोहोळ, बुलढाणा- प्रतापराव जाधव, नंदुरबार- गोवाल पाडवी, धुळे- शोभा बच्छाव, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अतुल धोत्रे, अमरावती- बळवंत वानखेडे, वर्धा- अमर काळे, रामटेक- श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोले, गडचिरोली-चिमूर- डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर, यवतमाळ- वाशिम, हिंगोली-गणेश पाटील आष्टीकर, नांदेड- वसंत चव्हाण, परभणी- संजय जाधव, जालना- कल्याणराव काळे, औरंगाबाद-संदीपान भुमरे, दिंडोरी- भास्करराव भगरे, नाशिक- राजाभाई वाजे, मावळ-श्रीरंग बारणे (महायुती), बारामती- सुप्रिया सुळे, शिरुर- अमोल कोल्हे, सातारा- उदयनराजे भोसले, अहमदनगर- निलेश लंके, बीड-??????????, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, लातूर- शिवाजी काळगे, सोलापूर- प्रणिती शिंदे, माढा- धैर्यशील मोहिते पाटील, कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले- धैर्यशील माने
0 टिप्पण्या