Top Post Ad

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)मुळे मानवी अस्तित्त्वालाच धोका


 आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)मुळे मानवी अस्तित्त्वालाच धोका असल्याचे खुद्द एआयचे जनक डॉ. जेफ्री हिंटन यांनी म्हटले. तर स्पेसएक्स आणि टेस्ला यासारख्या आघाडीच्या कंपनीचा प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी सत्य शोधण्यापेक्षा एआयचा वापर राजकीय हेतूने केला जाऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. VivaTech 2024 या परिषदेत बोलताना त्यांनी एआय आणि सोशल मीडियाचा वापर यावर भाष्य केले.  याआधी ७ मे रोजी लॉस एंजिलिस येथे झालेल्या एका जागतिक परिषदेतही मस्क यांनी हीच भूमिका मांडली होती. एआय अधिक पारदर्शक आणि प्रामाणिक असण्यासाठी या तंत्रज्ञानाला प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. जगभरात एआयचा वापर आणि त्यावरील संशोधन झपाट्याने होऊ लागले आहे. एआयमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जणू काही नवी क्रांती येत आहे. एआय जसे जसे विकसित होत जाईल, तसा त्याचा प्रभाव आणि परिणाम इतर क्षेत्रावरही जाणवू लागेल. जगभरातील अनेक मान्यवर मंडळी एआयबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. 

आगामी काळात लोकांना छंद म्हणून नोकरी करावी लागेल. कारण एआय रोबोट्स सर्व क्षेत्र व्यापून टाकतील. अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचे काम एआयकडून होईल. “तुम्हाला छंद म्हणून नोकरी करायची असेल तर तुम्ही करू शकाल. कारण तोपर्यंत एआय रोबोट्स हवे असलेले प्रत्येक काम करून देण्यास सक्षम झालेले असेल. एआयमुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या वर्तनात बदल होऊ शकतात, लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया कंपन्यात तीव्र स्पर्धा आहे, त्यामुळे युजर्सना अधिकाधिक खिळवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या स्क्रिन टाइम्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांनी बाहेर जाऊन मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे, पुस्तके वाचावीत. सोशल मीडियामुळे आपल्या मुलांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहेत, माझ्या मुलांना १८ वर्षांचे होईपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे फक्त फ्लिप फोन (बटण असलेले) दिले आहेत. त्यांना जर त्यांच्या मित्रांशी गप्पा मारायच्या आहेत, तर त्यांनी सरळ चालत जाऊन मित्रांचे घर गाठावे. आपणही ८०-९० च्या दशकात हेच करत होतो. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते काय करतात? कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेळ घालवतात? याची माहिती पालकांनी ठेवावी.”  एलॉन मस्क 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)मुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल. पण हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल आणि ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांचे नुकसान होईल. यामुळे समाजाला जबरदस्त हानी पोहोचू शकते, यासाठी सरकारने वैश्विक मूलभूत वेतनासंबंधीचे काही निकष ठरवायला हवेत. त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकतील. एआय स्वतःपासूनच प्रेरणा घेऊन अधिकाधिक विकसित होऊ शकते. माझा अंदाज आहे की, आतापासून पाच ते २० वर्षांपर्यंत एआयवर ताबा मिळविण्याच्या समस्येचा आपल्याला सामना करावा लागू शकतो.  एआयमुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आपण जैविक बुद्धिमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धिमत्ता तयार केलेली असेल. हे आपल्यासाठी अधिक चिंताजनक आहे. तसेच लोकांना मारण्याचा निर्णय एआयकडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो -  डॉ. जेफ्री हिंटन (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे जनक)  


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com