Top Post Ad

पाडव्याच्या मिरवणुका हे मूलनिवासींना गुलाम करण्याचे कारस्थान आहे!

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मैल, पौड, शेर, फूट, इंच, आणा ही परिमाणे रोजच्या वापरात होती. भारतीय शास्त्रज्ञ मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या कमिटीने दिनांक १४ नोव्हेंबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालाप्रमाणे आपण दशमान पद्धती स्विकारली. त्यामुळे किलो ग्रॅम, मिटर, लिटर व १०० पैशांचा रुपया झाला. त्याचप्रमाणे कमिटीने बनविलेल्या कालदर्शिकची ही अंमलबजावणी १ जानेवारी १९५७ पासून झाली. ही कालदर्शिका संपूर्ण जगाने अनुसरलेल्या जेग्रेरीअन कालगणनेवर आधारित असल्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतातही १ जानेवारीला नववर्षाचे स्वागत केले जाते. 

पाडव्याच्या मिरवणुकांची सुरुवात - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २००२ मध्ये चैत्र शुद्धप्रतिपदेला नववर्षाच्या मिरवणुका काढून नवीन पायंडा सुरु केला. यापूर्वी कधीही न निघणाऱ्या पाडव्याच्या मिरवणुका २००२ मध्ये का निघाल्या याच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.
१. ठाणे, कल्याण, डोंबिवली ही शहरे संघाची प्रमुख केंद्रे असल्यामुळे पाडव्याच्या मिरवणुकांची सुरुवात याच शहरातून पहिल्यांदा करण्यात आली.
२. २००२ मध्ये संघाच्या स्वयंसेवक भारताचा प्रधानमंत्री झाला. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी.
३. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार ढोराचे डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यासाठी
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ७५ वर्ष होऊन गेल्या बद्दल संघाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी.
५. या नववर्षाच्या मिरवणुका म्हणजे संघाचा वार्षिक अजेंडा बनला आहे. यामुळे या मिरवणुकांचे पेव इतर शहरातही फुटत चालले आहेत. 

संस्कृत शिकण्यावर बहुजनांना बंदी होती

भूभाग, वंश, संस्कृती, भाषा, धर्म या पाच अंशापासून राष्ट्रनिर्मिती होते असे संरसंघचालक गोलवलकर म्हणतात. वंश-आर्य, भाषा संस्कृत- वैदिक यातून ब्राह्मणराष्ट्र अशी व्याख्या तयार होते. म्हणजेच या शिरगणतीत गोलवळकर, मूलनिवासी बहुजनांना समाविष्ट करून घेत नाहीत.भारतातील बहुजनांना कधीही संस्कृत भाषा येत नव्हती कारण संस्कृत ही वैदिकांची भाषा आहे. संस्कृत लिहिण्यावर बोलण्यावर व ऐकण्यावर बहुजनांना सक्त मनाई होती. संस्कृत भाषा शिकल्यास बहुजनांचा (शुद्ध) शिरच्छेद करावा, त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत असे मनुस्मृती म्हणते. (१९५१ तसेच १९७१ च्या जनगनणेनुसार मातृभाषेच्या रुपात संस्कृत भाषा बोलणाऱ्यांची संख्या केवळ व केवळ ५५५ तसेच १२८४ होती. याने हे सिद्ध होते की, ब्राह्मण हे सर्व अल्पजन असून ते फार कमी संख्येने भारतात आले. तसेच महामारी व अन्य रोगांनी ब्राह्मण मरण पावल्याचे कुठेही नोंद नाही. तसेच दंगलीतही ब्राह्मण मेल्याची नोंद नाही- मूलनिवासी संपादक)

ब्राह्मणांनी या देशात जेव्हा आक्रमण केले तेव्हा त्यांनी या देशातील महान सभ्यतेला अर्थात मूलनिवासी बहुजनांच्या सिंधू सभ्यतेला नष्ट करण्याचे षडयंत्र केले. हे षडयंत्र आजही जगाला वैश्विक कलंक वाटतो. एकीकडे जग हे विवस्त्र व अज्ञानाच्या खाईत होते तर मूलनिवासी बहुजनांच्या भारतामध्ये कपड्यांचा शोध फार पूर्वीच लागला होता. स्थापत्य कलेने सर्वोच्च शिखर गाठले होते. विज्ञानाचा व न्यायीक विचाराचा ताळमेळ घालून जगातील सर्वात मोठे शोध सिंधू सभ्यतेत पहावयास मिळतात. ब्राह्मणांनी तेव्हापासून ते मौर्य साम्राज्य उदयाला येईपर्यंत या देशात ब्राह्मणी, जहरी विचारधारा थोपविण्याचे काम केले. ब्राह्मणांची प्रत्येक षड्यंत्रकारी कृती ही त्यांच्या धर्मग्रंथात आहे. त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर पहिल्यांदा या देशातील महान कला, शिल्प, भाषा, संस्कृती नष्ट करण्यासाठी केला. मौर्य साम्राज्याने गतवैभव पुन्हा प्राप्त करून जगामध्ये आपले अधिराज्य निर्माण केले.वर्णव्यवस्थेला जबरदस्त हादरा बसला. परंतु ब्राह्मण पुष्यमित्र शुंगाने पुन्हा प्रतिक्रांती केली. त्याने मौर्य साम्राज्यात घुसखोरी करुन मौर्य साम्राज्याचा वंशच सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथाची हत्या केली. इतिहासापासून सबक घ्यायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील इतिहासाच्या या घटनेपासून सबक घेतला असता तर भारताचा इतिहास न्याराच राहिला असता. ब्राह्मणांनी घुसखोरी तर केलीच त्याचबरोबर राजतंत्रावर पूर्णपणे कब्जा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जहर पाजून मारुन टाकले. 

हे सर्व षडयंत्र ब्राह्मणांनी केले. ते सर्व दडविण्यासाठी त्यांनी अपराधबोध भावनेने वारंवार पुन्हा पुन्हा विषारी फुत्कार मारलेच. ब्राह्मण सांगतो तो इतिहास ही भूमिका आता बदलली पाहिजे. कारण ब्राह्मण जो इतिहास लिहितो तो इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी, इतिहासाची मूळ साधने नष्ट करण्यासाठीच! मूलनिवासी बहुजनांना ते उमगू नये म्हणून खोटा-नाटा इतिहास रचण्यातही ते मागे-पुढे पहात नाहीत. मनुस्मृतीमध्येच तसा ब्राह्मणांना उपदेश दिलेला आहे. ब्राह्मणांनी या देशातील श्रमण संस्कृतीच्या सृजकांना अर्थात ओबीसींना हिन लेखले आहे. मनुस्मृतीमध्ये शेती करणे ब्राह्मणास पाप म्हटले आहे आणि आजचे ब्राह्मण शासक (काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट) यांना देखील शेती करणे हे पापच वाटते म्हणून वित्त बजेटमध्ये भांडवलदारांना खैरात तर शेतकऱ्यांना मरण आहे! छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीला लाथाडून शस्त्र हातात घेतले. ब्राह्मणांनी ओबीसींना शुद्ध म्हटले अर्थात मनुस्मृतीमध्ये त्यांना शस्त्रविहीन, अधिकारविहीन केले पाहिजे असा दंडक घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला हल्ला हा मनुस्मृतीवर आहे. 

मनुस्मृतीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ब्राह्मण कितीही नालायक असला तरी पुजनीय आहे! याचीच मराठी आवृत्ती भट रामदासाने 'मनाचे श्लोक' अर्थात मनुचे चोरी केलेले श्लोक 'दासबोधात' टाकले. ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती पण त्यांच्या कपाळावर अफझलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी दिलेली जखम होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीच्या व भट रामदासाच्या वचनांचा शिरच्छेद कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा शिरच्छेद करुन केला! त्याकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एवढे क्रांतीवीर व कर्तबगार होते त्यांनी आपला मुलगा छत्रपती संभाजी राजेंना ब्राह्मण शाहीपासून सतर्क करण्यासाठी संस्कृत विद्येचे तज्ञ केले. म्हणजेच मनुस्मृतीप्रमाणे शूद्राने संस्कृत शिकू नये याचा अव्हेर छत्रपती शिवाजी व संभाजी राजांनी केला. संभाजी महाराजांनी संस्कृतचा चांगला अभ्यास केला त्यांच्या लक्षात आले की, ब्राह्मण संस्कृत भाषेला एवढे गुढत्व का देतात? कारण त्यामध्ये षडयंत्राच्या षडयंत्रच भरून पडलेले आहे. संस्कृत साहित्यात काव्य म्हणजे बिभत्स लैंगिकतेचा कळसच! ब्राह्मणांची तिच खरी संस्कृती आहे. अहो, नुकतेच सेक्स कांडमध्ये डझनभर ब्राह्मण बाबा सापडलेच आहे की! 

पण छत्रपती संभाजी राजे यांनी प्राचीन भारतामध्ये आपला महानपुरुष शोधला. त्यांना खूप अस्वस्थ झाले असणार. आपला भोळाभाबडा समाज ज्यांना आपले मानतो तेच मूळात अब्राह्मणी नायक आहेत. संभाजी राजांनी आपला,आपल्या मातृभूमीचा सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र शोधला ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध! संभाजी राजांनी ब्राह्मणी काव्याप्रमाणे शृंगारिक काव्य रचले नाही तर बुद्धावर काव्य लिहिले ते म्हणजे 'बुधभूषण!' ब्राह्मण हा इतिहास जाणिवपूर्वक दडवतात. कारण यामध्ये खरी जी प्रेरणा आहे सत्य व स्वाभिमान शोधण्याची याने ब्राह्मण धर्म नष्ट होणार याची त्यांना भीती

मनुस्मृतीच्या संहितेनुसार संभाजी महाराजांची हत्या झाली-   छत्रपती संभाजी महाराज चांगल्या प्रकारे संस्कृत शिकले होते त्यांचा संस्कृतमध्ये लिहिलेला 'बुधभूषण' हा ग्रंथ उपलब्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत नायिका भेद,नखशिख सातसतक हे तीन ग्रंथ लिहिले विद्याविभूषित संभाजी राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांनी स्वराज्याशी बेईमान झालेल्या अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी या ब्राह्मण मंत्र्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. ब्राह्मणांची हत्या म्हणजे ब्रह्महत्या. याचा सूड घेण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत सर्व ब्राह्मण एक झाले. त्यांनी औरंगजेबाशी हातमिळवणी केली. रामदासांचा शिष्य रंगनाथ स्वामी त्याचे रामदासी अनुयायी यांनी संभाजी महाराजांनी संगमेश्वर येथे पकडून दिले. संभाजी महाराज ४० दिवस सुरक्षित होते.परंतु औरंगजेबाच्या दरबारातून ब्राह्मण मंत्र्यांच्या आग्रहास्तव संभाजी महाराजांचे हाल-हाल करुन हत्या करण्यात आली. त्यांची जीभ कापण्यात आली. शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले. कारण या सर्व शिक्षा मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे देण्यात आल्या होत्या.

संभाजी महाराजांचे शिर बांबूला लटकवून तुळापूर जवळ वळू-आपटी परिसरात मिरवून लोकांत दहशत निर्माण करण्यात आली. ताबडतोब दुसऱ्या दिवशी चैत्र्य प्रतिपदेला ब्राह्मणांनी गुढ्या उभारुन आनंद व्यक्त केला. बहुजनांचे राज्य पालथे घातले म्हणून साडी-चोळी बांब घुसवून त्यावर तांब्या पालथा घातला. गुढी हा विचित्र प्रकार महाराष्ट्रातील भाग सोडून अन्य राज्यात नाही हे विशेष! गुढी पाडवा नावाचा प्रकार छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात नव्हता. तुकाराम महाराजांच्या अभंगात देखील त्याचे संदर्भ सापडत नाही. ब्राह्मणांचे जे जे उत्सव आहेत त्यामागे फार व्यापक असे षड़यंत्र दडले आहे. जिथे जिथे मूलनिवासी बहुजन नायकांची हत्या करण्यात आली त्यालाच ब्राह्मणांनी सण, उत्सव म्हणून साजरा करावा असा दंडक पाडला! छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाने नव्हे तर शासन-प्रशासनात असलेल्या ब्राह्मणांनी मारले. नंतर ब्राह्मणांनी विशेषतः तथाकथित ब्राह्मण इतिहासकारांनी छत्रपती संभाजी राजांचे चारित्र्यहनन केले. त्यासाठी त्यांनी काही दंतकथा बनवून प्रचारित केल्या.

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात नागवंशीय राजांनी बनविलेल्या प्राचीन लेण्या आहेत. त्याच्या एका बाजूला औरंगजेबाचा संकल्पित बिबिका मकबरा आहे. हा मकबरा ज्यांनी बनविला त्या इस्लाम राजाने बौद्ध लेण्या नष्ट केल्या नाहीत आणि मलिकाम्बर जो अत्यंत कर्तबगार राजा होता त्याने स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करून मध्ययुगीन भारतामध्ये डोंगरातून पाणी साठवून भूगर्भातून पाणी शहरात आणण्याची जी अफलातून पद्धती अवलंबविली त्यांनी देखील बौद्ध लेण्या नष्ट केल्या नाहीत. वर्तमान काँग्रेसने त्या बौद्ध लेण्या व प्राचीन वारसा नष्ट करण्याचा सपाटा सुरु केला आहे! या लेण्यांच्या दुसऱ्या बाजूला गोगा पीर नावाने एक डोंगर प्रसिद्ध आहे. त्याच्या पायथ्याशी एक 'सोनेरी महल' म्हणून प्रसिद्ध महल आहे. ब्राह्मणांनी अशा दंतकथा निर्माण केल्या की संभाजी राजे व औरंगजेबाची मुलगी या ठिकाणी एकांतात भेटत होते.

हा आहे ब्राह्मणांचा चारित्र्यहननाचा प्रकार! आईपेक्षा थोराड असणाऱ्यांसोबत असले कृत्य राजांकडून कसे होणार? बरे, संभाजी सहयाद्रीमध्ये आणि ते औरंगाबादला काय रोज विमानाने जाणे-येणे करीत होते? सरदेसाई या ब्राह्मणाने तर छत्रपती संभाजी महाराजांचे एवढे चारित्र्यहनन केले त्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरुने त्यांना १९५७ ला 'पद्मविभूषण'ने नावाजले! आता काँग्रेस, माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी संभाजी राजे महाराजांचे चारित्र्यहनन करणाऱ्या बाबा पुरंदरे यास डोक्यावर घेऊन नाचत आहेत! 'रायगडला जेव्हा जाग येते' या नाटकातही संभाजी राजांचे चारित्र्यहनन केले आहे. संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन वडूबुद्रुक येथे फेकण्यात आले. ही बाब जेव्हा अस्पृश्य म्हणून ब्राह्मणी संस्कृतीने नाकारलेल्या नागवंशीय महार, मांग, चांभार यांना कळाली तेव्हा त्यांनी त्या संभाजी राजांच्या शरीराच्या तुकड्यांना अत्यंत कंठघोषाने, आक्रंदून गोळा केले. 

ब्राह्मणांचा उद्देश हा की, संभाजी राजांच्या शरीराची बोटी-बोटी करणे जेणेकरून ती कावळे-गिधाडांनी खावीत. नागवंशी मराठे हा इतिहास विसरली आणि त्यांनी ब्राह्मणांपुढे गुलामी पत्कारली. संभाजी राजांना औरंगजेबाने इस्लाम धर्म कबूल कर असे जे म्हटले ते धादांत खोटे आहे. ब्राह्मणांनी अशाप्रकारे खोटा इतिहास रचून धर्मपरिवर्तीत मूलनिवासी मुसलमान व ओबीसींमध्ये कायमची तेढ निर्माण केली. कारण ब्राह्मणांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये ४५ टक्के मुसलमान ठेवले व मोक्याच्या जागी मुसलमानच ठेवले आणि ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मोगलांची वकीली करीत होते हा इतिहास दडवायचा होता. हा आहे त्यांचा यामागे अपराध बोध! बडू बुद्रुक येथील जागी संभाजी राजांच्या शरीराची तुकडे गोळा करुन टाहो फोडणारे लोक आणि नागवंशी मराठा एकच! संभाजी राजांच्या स्मृती जतन करण्याचे काम नागवंशी महार, मांग, चांभार आदि लोकांना सतत स्मरण करेल!!

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशके ही कालगणना पेशव्यांनी बंद केली. त्याचप्रमाणे पेशव्यांनी शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज उतरवून त्या जागी पेशवाईचा जरीपटक्याचा ध्वज चढविला. 

पेशवाईत बारा बलुतेदारांनाही ब्राह्मणांच्या घरात प्रवेश नव्हता-  गुढी उभारणे म्हणजे पेशवे नामक राज्याचे प्रतिक आहे. ज्या राज्यात बहुजन स्त्रियांची भर बाजारात बोली लावून विक्री होत होती. ज्या राज्यात आमच्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगे बांधले जात होते, पाठीला झाडू बांधला होता त्यांच्या पावलाचे ठसे जमीनीवर उमटले तरी त्यावरुन चालणे विटाळ होत होता. ज्या राज्यात बारा बलुतेदारांनाही ब्राह्मणांच्या घरात प्रवेश नव्हता. अशा पेशव्यांची गुढी उभारणे म्हणजे पूर्वजांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या जखमांवर मीठ चोळणे होय. राम (पुष्यमित्रशुंग) राजा झाला तेव्हा लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या असे ब्राह्मण म्हणतात. प्रत्यक्षात संभाजी राजांची हत्या व सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ या सदृश्य घटना आहेत. ब्राह्मण सेनापती पुष्यमित्रशुंगाने बहुजनांचे राज्य उध्वस्त केले. त्यावेळी गुढ्या उभारल्या असतील किंवा नसतील परंतु बौद्ध भिक्षूंचे शिर-मुंडके कापून टाकणाऱ्यास पुष्यमित्रशुंगाने सोन्याच्या मोहरा वाटल्या होत्या. संभाजी महाराजांची हत्या ही बहुजनांसाठी धक्कादायक व काळजाला पीळ घालणारी घटना आहे. म्हणून चैत्र प्रतिपदेला ब्राह्मण आनंद साजरा करण्यासाठी श्रीखंड खाउन शोभायात्रा काढीत असले तरी मूलनिवासी बहुजन मात्र हे कटू दुःख पचविण्यासाठी कडूलिंबाचा पाला खातात हे सत्यही नाकारता येणार नाही! तसा मूलनिवासी बहुजन समाजाचे या निसर्गातच पहावयास मिळतात. मूलनिवासी महामाता तुलसी अर्थात वृंदा यांच्या पतीस अर्थात जालंधरला कपटाने ब्राह्मण पुरुष विष्णुने मारले. नंतर तुलसीची देखील हत्या याच ब्राह्मण पुरुष विष्णुने केली. त्या महामातेस आजही मूलनिवासी बहुजन समाज दररोज तुलसीपुढे नमन करुन स्मरण करतो. कडूलिंबाचे झाडही प्रतिकात्मकच आहे. त्यास ब्राह्मण विष्णुचे प्रतिक म्हणून प्रचारित करतात याचा ध्वन्यार्थ हा असा आहे की, ब्राह्मण हे कटू असतात त्यांच्यापासून सावध असावे!! 

ब्राह्मण बहुजनांवर मायाजाल पसरवितात - सुमारे १०० वर्षापूर्वी बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळी भास्करराव जाधव व प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितले होते की, ही वृत्ती भविष्यात हिंदू-मुस्लिम दंगे घडविण्याचे ब्राह्मणी कारस्थान आहे आणि ते खरे ठरले. गणेशोत्सवात डिजिटल बॅनरवर फोटो छापतातच. कार्यकर्ते खूष होतात. प्रिंटेड बनियान घालून राब-राब राबतात. बहुजनांचे कोट्यावधी रुपये व कार्यकर्त्यांचा वेळ, श्रम वाया जातात. मात्र त्यांचा सामाजिक, राजकीय व आर्थिक फायदा मात्र ब्राह्मणवादाला होत राहतो. राम मंदिर, राम सेतू, मुस्लिम द्वेष, साध्वीला अटक, हिंदू देवतांची विटंबना अशा अनेक मार्गानी ब्राह्मण बहुजनांवर मायाजाल पसरवितात. बँढ वाजवून राष्ट्रसुरक्षा निनाद मिरवणूक काढतात. बहुजनांना त्यांच्या छत्राखाली संघटीत करतात. पाडव्याच्या मिरवणूकीचे फोटो पहिल्या पानावर छापतात. त्यामध्ये मिरवणूकीच्या अग्रभागी मोटर सायकल चालविणाऱ्या पारंपारिक ब्राह्मणी वेशभूषा केलेल्या तरुणी मिरणूकीचे प्रमुख आकर्षण असते. प्रथम दर्शनी हे दृश्य पाहणाऱ्याला मनमोहक व नयनमनोहर वाटेल. परंतु त्यामागील ब्राह्मणी कारस्थान साध्या भोळ्या मिरवणूकांच्या बहुजनांना माहित नाही. या कारस्थानापासून आमच्या बहुजन बंधू-भगिनींना सावध करणे गरजेचे आहे. कारण भविष्यात या मिरवणूकींचे स्वरूप गणेशोत्सवाप्रमाणे होईल व परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल! मूलनिवासी बहुजनांची संस्कृती ही मिन्न अशी आहे. आपल्या संस्कृतीत आणि ब्राह्मणी संस्कृतीत मध्ये अंतर आहे. ब्राह्मण 'समन्वय' (ॲसिमिलेशन) या जहरी तंत्राचा वापर करुन ब्राह्मणी मतप्रवाह मूलनिवासी बहुजनांवर बळजबरीने थोपवितात. त्यासाठी ते पुन्हा आपल्या मूलनिवासी महापुरुषांचा बळी घेतात! संभाजी राजांचा बळी घेतल्या नंतरही 'सिंहाचे दात' मोजण्याच्या म्हणी याच ब्राह्मणांनी प्रचारित केल्या. अहो ओबीसींना ब्राह्मणांनी शिक्षणापासूनच वंचित ठेवले, अधिकारापासून वंचित ठेवले त्याबाबत आम्ही कधी जाब विचारायचा ? मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राष्ट्रीय मुद्दा व संविधानिक मुद्दा आहे. आपण आय.ए.एस. किती आहेत? आय.पी.एस. किती आहेत? डॉक्टर, वकील, इंजिनीअर किती आहेत? याची गिणती आपण कधी करायची? आपल्या शौर्याचा आपणाला जरुर अभिमान असावा पण माना मोडून लाचारपणे जगण्याला काही किंमत आहे? संभाजी राजांचा अवमान हा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर अवघ्या राष्ट्राचा अपमान आहे. गुढीपाडवा हे ब्राह्मणांनी मूलनिवासी बहुजनांच्या बोकांडी बसविलेले भूत आहे. "ब्राह्मणशाही गाडण्यासाठी संभाजी राजांचा तेजोमयी इतिहास अंगिकारावा लागेल." शत्रू आणि मित्राची ओळख करुन ज्या विदेशी ब्राह्मणांनी एकसंघ समाजास ज्या ६ हजार जातीत विभाजित करुन गुलाम करुन ठेवले आहे त्यांना एकत्रित जोडावे लागेल. छत्रपती संभाजी राजांसारखी कर्तबगार, महान कार्य करणारी मुले या मूलनिवासी बहुजन समाजात निर्माण करावे लागतील.खरे संभाजी राजे व त्यांचा महान इतिहास घरा-घरात पोहचावा लागेल!


  • छत्रपती संभाजी महाराज
  • प्रा. विलास खरात / एन.जी. पाटील
  • मो.९८६९२८५७८९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com