Top Post Ad

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार...? संजय राऊतांची तक्रार !


   कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊतांनी व्यक्त केला असून त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक आहे, असं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं आहे

राजांच्या जवळच्या व्यक्तीला आठ हजार कोटींचा ॲम्बुलन्स कॉन्ट्रॅक्ट दिला. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रोखित पैसे वळवायचे आणि हा पैसा राजकारणात वापरायचा. गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी हा पैसा वापरला जातोय उद्याच्या निवडणुकीसाठी हा पैसा वापरला जातोय असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला. श्रीकांत शिंदे यांच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात 40 ते 50 लाखांचे उलाढाल होते. त्यांच्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि करणाचे अवतार कोण आहेत? त्याचा हिशोब व्यवहार धर्मदाय आयुक्तकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर ठेकेदारांना तुम्ही कंत्राट देत आहात असल्याचेही राऊत म्हणाले.  साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये या कंपन्यांकडून कोट्यावधींची अशी लूट करण्यात आली आहे. मनी लॉंडरिंग पी एम एल ए फॅक्ट सारखा कायदा आहे या नुसार दिसते. तुमच्या फाउंडेशन वर नक्की कोण काम करतं? कुटुंबातील लोक आहेत का की इतर कोण लोक आहेत पैसे गोळा करायला? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

संजय राऊत म्हणाले की,  भाजपच्या कुठल्याच व्यवहारात पारदर्शकता नाही. पी एम केअर फंडाचा हिशोब नाही. तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून कोटी रुपये गोळा केले. अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा महाराष्ट्रात आहे. नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे रीतसर माहिती मागविली आणि तक्रार केली. श्रीकांत शिंदे यांचे व्यवहार काय आहेत या संदर्भात माहिती मागितली. नगर मधील 35 मुलांना 90 लाखांचे अर्थसहाय्य दिले. गणेश उत्सवासाठी 500-600 एसटी गाड्या बुक केल्या गेल्या. याचे पैसे कोणी भरले हा मुद्दा आहे. बाळराजांच्या फाउंडेशन करता कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत. हे सरकारचे बाळराजे आहेत. चंदा दो धंदा लो याच माध्यमातून हे पैसे गोळा करत आहेत. सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे मागणी केली की यांची बॅलन्स शीट कुठून त्यांना फंड मिळाला याची माहिती द्या. धर्मदाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत पाच महिन्यांपासून माहिती दिली जात नाही असंही संजय राऊत म्हणाले.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलाकारांना मोठ्या विदेशी पैसे कोणाकडून दिले जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल. मुलुंडचे नागडे पोपटलाल हिशोब मागतात ते स्वतः अकाउंटंट आहेत माझा आवाहन आहे नागड्या पोपटलाल यांना घ्या जनतेचा पैसा आहे उपमुख्यमंत्र्यांकडे आवाहन आहे. इ डी आणि सीबीआयची केस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे. इडी आणि सीबीआयकडे रीतसर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न आम्ही उद्या करणार आहोत. हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न आहे. अशाच एका खटल्यात बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पद गमाव लागलं होतं असंही संजय राऊत म्हणाले.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र जाहीर केलं. मोदी की गॅरंटी नावाने असलेल्या या संकल्प पत्रात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. यात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे.  प्रत्येक जाहीरनाम्यात भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींचा समूळ उच्चाटन करू असं लिहिल आहे. गेल्या दीड दोन वर्षात सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले. हे ढोंग आहे तरीदेखील आम्ही प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवतो. निवडणूक रोखे घोटाळा हा या विश्वातला सगळ्यात भयंकर घोटाळा आहे. अनेक ठेकेदार, दारूवाले, कंत्राटदार यांना हजारो कोटींची कामे द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भाजपाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये जमा करायचे हा गोरख धंदा भाजपने सुरू केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.


संजय राऊतांनी पंतप्रधांना लिहिलेलं पत्र ...
देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा’ करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.
महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना ‘रोख’ स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सदर बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. सदर निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु सदर उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com