"वृद्धापचायी अनुसुय्यको सिया। कालञ्चऽस्स गरुनं दस्सनाय।।
धम्मिकथं एजयितं खणञ्जू। सुणेय्य सक्कच्च सुभासितानि।।
कालेन गच्छे गरुनं सकासं। थंभं निरंकत्वा निवातवुत्ति।।
अध्य धमं संयम ब्रह्मचयरिया। अनुस्सरे चेव समाचारे चा।।"
तो संपूर्ण मानवांच्या व जगताच्या कल्याणासाठी अर्थात केवळ परोपकार करण्यासाठी अवतरित होत असतो. त्याने दिलेले ज्ञा न हे दिव्यज्ञान असते. शिष्य जसा त्याचा वापर करेल तसा त्याचा परिणाम त्याच्या जीवनात दिसून येईल. तप्त लोहाच्या गोळ्याप्रमाणे ते असते. त्यापासून सुईसारखे हत्यार घडविल्यास ते जोडण्याच्या कामी पडते. तर सुरी घडविल्यास ती तोडते. सद्गुरूला मात्र मनाशी मने व माणसाशी माणसे जोडणारा शिष्य अपेक्षित असते. तेव्हाच ब्रह्मज्ञान सत्कारणी लागले, असे म्हणता येते, अन्यथा नाही. तप्त लोहगोळ्यावर काहीच प्रक्रिया केली नाही तर तो थंड होऊन निरुपयोगी ठरतो. स्वार्थापेक्षा परमार्थ अधिक पटीने साधला पाहिजे. शिष्याने आपल्या दैनंदिन जीवनात चुकल्या-माखल्याची क्षमायाचना या गुरूपूजेच्या पावन समयी केली पाहिजे. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात-
"सद्गुरूवांचोनि सापडेना सोय!
धरावे ते पाय आधी आधी!!"
समोरचे मनोहारी दृश्य बघण्यासाठी लोक गर्दी करतात. अशावेळी आई बाळाला कडेवर घेत असते. तर वडील मुलाला खांद्यावर घेत असतात. याबाबत त्यांना प्रश्न केले, की असे का? तर ते कृपाळू मायबाप मोठ्या महत्वाकांक्षेने सांगत असतात, की आपण जे पाहू शकलो नाही. ते आपल्या लाडक्या मुलांनी पाहावे. आहे की नाही हे नवल? किती हे औदार्य, किती ही दया! मायबापांची जशी अपेक्षा व महत्वाकांक्षा तशीच सद्गुरूची पण असते. मायबापांनी कड्या-खांद्यावर घेतलेल्या मुलांनी मात्र अपेक्षेप्रमाणे जे डोळ्यांत साठवायचे आहे, नेमके तेच दृश्य साठवले पाहिजे. तरच ते कष्ट सार्थकी ठरले म्हणावे. जर मुलांनी लोकांचे काळे-गोरेपणा, साधे-झकपक पोषाख, काळे-पांढरे केस आदी गोष्टीच न्याहाळत राहिले. तर मात्र मायबापांचे परिश्रम, इच्छा व महत्वाकांक्षा पार धुळीस मिसळून गेले की हो! यशस्वी जीवनात अशा मौलिक संधी आणि उपलब्धता या केवळ गुरूद्वारे मिळालेल्या ज्ञानामुळे शक्य झाले. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूला नमन करण्याचा, गुरू पूजन करण्याचा हा गुरुपौर्णिमा सण आहे. मायबाप, पालक, मार्गदर्शक हे सगळेच गुरुस्थानी मानावे. ज्याला गुरू नाही, असा मनुष्य जगात शोधूनही सापडणार नाही. गुरू सहजच कितीतरी मिळतात, मात्र सद्गुरू सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन मिळवावा लागतो. संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराज समजावतात- सम्पूर्ण अवतारबाणी: पद क्र. १४१- ओवी ९ व १० वी-
"रीझ जाय यदि सद्गुरू अपना रीझ गया समझो भगवान!
कहे 'अवतार' गुरु कृपा से कण मिट्टी का गगन समान।"
खरे गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द शिरसावंद्य मानून त्यावर चालणे म्हणजे खरे गुरुपूजन! खरे तर गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, गुरूगीतेत म्हटलेच आहे-
"ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥"
!! गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!
अलककार- श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे (से. नि. प्राथ. शिक्षक)
रामनगर- गडचिरोली. मधुभाष- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या