Top Post Ad

हैदराबादच्या नवीन स्मारकाची गोष्ट


 डॉ. बी.आर. आंबेडकर अर्थात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या 125 फूट भव्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.  14 एप्रिल 2016 रोजी बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, तेलंगणा शहरातील सचिवालयाशेजारील एनटीआर गार्डनमध्ये त्यांचा 125 फूट उंच पुतळा बसवणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली होती.

राज्य सरकारने 11 एप्रिल 2016 रोजी अनुसूचित जाती विकास (BUD.LA) विभागाच्या GO Rt. क्रमांक 211 जारी केला, डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याच्या उभारणीसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री कडियाम श्रीहरी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर विग्रह आविष्कार समिती स्थापन करण्याचे आदेश जारी केले.  शासनाने 21 मे 2016 रोजी GO Rt क्र. 291 जारी केला, अनुसूचित जाती विकास (BUD.LA) विभागाने संबंधित माहिती संकलित करण्यासाठी एक तांत्रिक समिती देखील स्थापन केली आहे.  4 एप्रिल, 2018 रोजी, सरकारने पुढे अनुसूचित जाती विकास (BUD.LA) विभागाचा GO Rt क्रमांक 152 जारी केला आणि बांधकामादरम्यान तपशीलवार प्रकल्प अहवाल आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून मेसर्स डिझाइन असोसिएट्सची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  • - पेडेस्टलची उंची: 50 फूट
  • - पेडेस्टलचा व्यास:
  • तळमजला: 172 फूट
  • टेरेस: 74 फूट
  • - पुतळ्याची उंची: 125 फूट
  • - पेडेस्टल स्ट्रक्चरमध्ये बिल्ट-अप एरिया:
  • खालचा तळमजला: 2066 Sft
  • तळमजला: 15200 Sft
  • - टेरेस फ्लोअर: 2200 Sft
  • - अनुषंगिक इमारतीमधील बिल्ट-अप क्षेत्रः 6792 Sft
  • - एकूण बिल्ट-अप क्षेत्र: 26258 Sft.
  • - स्मारक इमारतीतील सुविधा:
  • - डॉ बी आर आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे प्रदर्शन करणारे संग्रहालय आणि गॅलरी.
  • - लँडस्केप आणि हिरवळ: 2.93 एकर
  • - सुमारे 450 कारसाठी पार्किंग.
  • - लिफ्ट 15 प्रवासी- 2 संख्या
  • - पुतळ्याच्या आर्मेचर स्ट्रक्चरमध्ये वापरलेले स्टेनलेस स्टीलचे प्रमाण: 360 MT.
  • - पुतळ्याच्या कास्टिंगमध्ये वापरण्यात आलेले कांस्य प्रमाण: 114 मेट्रिक टन.

 तेलंगणा सरकारने 14 एप्रिल 2023 ला ,125 फूट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकाचे उदघाटन केले. कमी वेळात काम  झाले. मुख्यमंत्री KCR  यांचे अभिनंदन । विशेष म्हणजे  माननीय adv बाळासाहेब आंबेडकर हे  अतिथी होते.खूप छान  सहयोग साधला. 

 तेलंगणा सरकारने केलेली अतिशय महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी अनुसूचित जातींच्या विकासासाठी स्वतंत्र कायदा  केला. महाराष्ट्र सरकार कडे 2017 पासून हा प्रस्ताव / बिल पडून आहे. न होण्याचे कारण म्हणजे उदासीनता.   तेलंगणा सरकारने अनुसूचित जातीसाठी scsp मध्ये, मागील 7 वर्षात  1 लाख 13 हजार 192  कोटी  खर्च  केला . महाराष्ट्र सरकारने  वर्ष  2014 पासून 2022 पर्यंत  44 हजार कोटी खर्च केले आणि 40 हजार कोटी  नाकारले, अखर्चित ठेवले..  44 हजार कोटीचा। scsp चा निधी कुठे खर्च झाला, कोणावर खर्च झाला, कशासाठी झाला, कशाप्रकारे झाला हे सरकारने सांगावे. अखर्चित 40 हजार कोटी कुठे गेले?

ही तुलना करताना , कोणतं सरकार चांगलं तर तेलंगणाचे म्हणावे लागेल. महाराष्ट्र पुरोगामीम्हणत असलो तरी  , छत्रपती शिवाजी  महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर काम करणारे सरकार, सर्वसामान्यांचे , सामाजिक न्यायाचे सरकार  प्रतक्ष्यात काम करताना दिसत नाही. फक्त इव्हेंट्स, रॅली, सभा याशिवाय महाराष्ट्रात काहीच दिसत नाही. पोलीस यंत्रणा  गुंतुन गेली आहे. अत्याचार अन्याय वाढत चालला आहे. भ्रष्टचार व शोषण वाढत आहे. सामान्य लोक त्रास सहन करीत आहेत.   संविधानाशी एकनिष्ठ होऊन, संविधानाच्या शपथेशी आठवण करून  सरकार आपली जबाबदारी कधी  पार पाडेल ?  जयंती दिनी बाबासाहेब यांचे गुणगान , करायचे मात्र विपरीत ।  बजेट कायदा कधी होणार।?   सरकार ,निर्णय घ्या ।

  • इ झेड खोब्रागडे, 
  • भाप्रसे ( नि )संविधान फौंडेशन ,नागपूर
  • म 9923756900.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com