हीच त्या समाजाची मूळ लायकी आहे!

  RSS सर्वात जास्त द्वेष पंडित नेहरुंचा करतो. महात्मा गांधीपेक्षा गोडसेने नेहरुंची हत्या करायला हवी होती, असे त्यांचे मत आहे. नेहरुंची उदारमतवादी, पुरोगामी भूमिका RSSला पचनी पडत नाही. RSSने  स्वातंत्र्य-चळवळीला विरोध केला होता. त्यांचे धोरण सुरुवातीपासूनच  ब्रिटिशधार्जिणे होते.  मिळेल त्या मार्गाने काँग्रेस, गांधी, नेहरु यांना विरोधच केला. १९४७  नंतर नेहरु जेव्हा नवीन देशाची उभारणी करत होते, तेव्हा हे त्यांची बदनामी करण्यात मग्न होते. पण, RSSने कधिही त्यांच्या कार्यकर्त्यांना असा आदेश दिला नाही की, या सरकारची नोकरी करु नका किंवा सरकारी योजनांचे फायदे घेऊ नका...  विरोध काँग्रेसला, तिरंग्याला पण, सरकारी नोकरीला नाही... सरकारी योजनांचे फायदे उपटायला  एका पायावर तयार!

       नेहरुंना शिव्या देऊन त्यांनीच स्थापन केलेल्या सरकारी कंपन्यांत नोकरी करायला लाचार.. जीव पणाला लावत... याना पोटापाण्याला लावायचं नेहरुंनी आणि त्याच अन्नदात्या नेहरुंना शिव्या देण्यात  पुढेच... ना जनाची लाज, ना मनाची लाज !!! आजही फेसबुक वर, व्हॉट्स ॲपवर काँग्रेस, इंदिरा गांधींची बदनामी करणारे कित्येक अर्धवट राव राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालेले दिसतात. त्या कृतघ्न लोकांना इंदिरा गांधींच्या कृपेने बँकेत नोकरी, बँकेचं घर मिळालेलं असतं. पण त्यांच्याप्रति कृतज्ञता बुद्धी नसते.  एलआयसी मध्ये नोकरी करायची आणि शाखेत बौद्धिकं ऐकायची... सरकारी बँकेत, सरकारी ऑईल कंपन्यात नोकरी करायची आणि शाखा पण लावायची!  म्हाडात घर घ्यायचं, एमआयडीसी मध्ये फॅक्टरी टाकायची , BARC मध्ये नोकरी करायची, मुलाला एअर इंडियात लावायचं, युनिट ट्रस्ट मध्ये पैसे गुंतवून भरघोस डिव्हिडंड खायचा, आयआयटी, आयआयएम मध्ये प्रवेश घेऊन नवरत्न कंपन्यांत नोकरी पटकावायची आणि त्याच तोंडाने काँग्रेसबद्दल गरळ ओकत रहायचं. हे दुटप्पी धोरण आयुष्यभर ठेवायचं.

        काँग्रेस राजवटीचे उपकार विसरुन दिवंगत नेत्यांचा द्वेष करुन  , स्वतःची उन्नती झाल्यावर, हिंदूराष्ट्राची स्वप्नं पडणाऱ्या स्वार्थी समाजाला हेच दिवस दिसणं, हीच त्या समाजाची मूळ लायकी आहे! सरकारला विनंती आहे की,  ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेनुसार पेन्शन हवी असेल त्यांना जुन्याच योजनेनुसार पगार देखिल द्यावेत. ६वा व ७ वां पे कमिशन रद्द करावा.  आणि तरीदेखील ह्यांना संपावर जायचे असेल तर, महाराष्ट्रातील कोटी दीड कोटी तरुण तरुणी बेरोजगार आहेत, अगदी सध्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या निम्म्या पगारात देखिल ते नोकरी करायला तयार आहेत, त्यांना संधी द्यावी.  सरकारी कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, तूम्ही नोकरी करून सरकारवर उपकार करत नाही, तर उलट तुम्हाला नोकरीची संधी देऊन सरकार तुमच्यावर उपकार करते.

शेतकरी, कामगार, कष्टकरी, गैरसरकारी लोक १)यांना काय पेन्शन आहे का?  )शनिवार रविवार न काम करता पगार मिळतो का?  टेबल खालून पैसा मिळतो का? सणवार उत्सव ह्याला सुट्टया मिळतात का?  दर दोन महिन्याला कोणती पगारवाढ मिळते का?  दिवाळी ला बोनस मिळतो का?  पोरांची शाळेची, क्लास ची फी मिळते का? मेडिकल बिल मिळते का? कोणी साहेब साहेब म्हणते का?  दोन चार वर्षांनी फुकटची पदोन्नती मिळते का? नाही ना? मग तरी आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी संपावर जातो का? नाही ना.

मग कशाला सहन करायची ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची नाटक? ह्यांनी जर संप मागे नाहीं घेतला तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून ह्यांच्या विरोधात आंदोलन करणार. सरकारी कर्मचारी म्हंजे पांढरा हत्ती आहे. वेळेवर “माहूताने” आवर घालावा. नाहीतर राज्य विकावे लागेल ह्यांचे लाड पुरवता पुरवता....सरकारने भयंकर पगारवाढ केल्याने समाजात आर्थिक विषमता वाढली आहे. सरकारी नोकरीला असणाऱ्या भावाचा बंगला आणि शेतकरी भावाच्या घराला साधे प्लास्टर सुद्धा नाही. सरकारी भावाच्या पत्नीच्या अंगावर तोळे तोळे सोने आणि आमच्या शेतकरी भावाच्या पत्नीचे गुंजभर आहे ते पण बँकेत गहाण पडले आहे. ह्यांची पोरं इंग्लिश मिडीयमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपारचा पिवळा भात खायला. ह्यांच्या पोरांना इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि आमची पोर बीए बीकॉम करत परत घरी बसणार. यांची पोर कॉलेजला चारचाकी  दोनचाकी वर जाणार आमची पोर बस स्टँड वर वाट पाहत बसणार. आम्हीं रात्रंदिवस उन्हातानात काम करणार, रात्रीच्या वेळेस बिबट्या, साप यांची भीती बाळगून आयुष्यभर काम करणार आणि म्हातारपणी संजय गांधी निराधार योजनेचे 1000 ची वाट पाहणार आणि हे सरकारी कर्मचारी म्हातारपणी 30 ते 40 हजार काही काम न करता येणार  अशी भयंकर आर्थिक विषमता समाजात निर्माण झाले आहे. आणि ती मिटवायची असेल तर सरकारने पेन्शन द्यायला नको...

दुर्गेश सखाराम बागुल सर .... ७२०८९००८००

-------------------------------------------------

भाजप आज सत्तेत आहे, आज ना उद्या जाईल. पण या पक्षानं सत्तेची जी नवी वहिवाट घालून दिली आहे ती या देशासाठी पुढची कैक वर्ष त्रासदायक राहणार आहे.  विधिनिषेधशून्य राजकारणाचा पुढचा भयंकर अध्याय या पक्षानं सुरू केला आहे. सत्तेसाठी वाट्टेल त्या लांडयालबाड्या करा, पण सत्ता सोडू नका ही संस्कृती आता इतकी रुजली आहे की लोकांना ते  normal वाटतं. भ्रष्टाचाराचा विरोध वगैरे म्हणत हा पक्ष सत्तेत आला, भ्रष्टाचाराचं प्रारूपच बदलून टाकलं आणि भ्रष्टाचार institutional करून टाकला या पक्षानं. इतर पक्ष टेंडरांमध्ये टक्केवारी खात, हा पक्ष अदानीच्या मदतीनं अख्खं टेंडरच खायला लागला.  आणिबाणीत इंदिरा गांधींनी काही घटनात्मक संस्था बिघडवल्या हे खरंय पण मोदी शहांनी तर चांगली म्हणावी, निर्विवाद म्हणावी अशी एकही घटनात्मक संस्था शिल्लकच ठेवलेली नाही.

खोटा प्रचार, खोटे भडकाऊ व्हीडीओ काढून समाजात तेढ निर्माण करणं हा आता गुन्हा राहिलेला नाही, आता त्याला 'चाणक्यनीती' म्हणतात. देशाचे पंतप्रधान अभिमानानं ट्रोल्सना फाॅलो करतात ट्वीटरवर. जो जो भाजप विरोधी तो तो देशद्रोही म्हणणार्‍या टोळ्या तयार केल्या आहेत. आमचे विरोधक नसून शत्रूच आणि तुम्हाला फक्त हरवणार नाही, संपवूनच टाकणार अशी नीचतम राजकीय संस्कृती रुजवलीय या पक्षानं. राजकीय पक्षांचा अवकाश पूर्णतः संपवला. भ्रष्टाचार करून भाजपा बाहेर राहिला तर तो भ्रष्ट, भाजपात आला की देशभक्त अशी एक अतिशय धोकादायक वहिवाट या पक्षानं घालून दिली आहे. 

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं आणि ते ही यशवंतराव चव्हाण जन्मदिनी तर महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती या पक्षानं पूर्णतः बरबाद केली. विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर पक्षांना धमक्या देतात, आम्हाला तुमच्या भानगडी माहीत आहेत आणि त्या योग्यवेळी काढू अशी थेट राजकीय सौदेबाजी करतात, हे महाराष्ट्रात पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. शिवसेनेसारखा पक्ष पूर्णतः पळवला. शिंदेसेना सध्या आनंदात आहे पण हा आनंद क्षणिक आहे. भाजपात आली नाही ही टोळी तर या टोळीवरही ईडी सोडली जाणार आहे. शिवसेनेत फक्त खांदेबदल हा उद्देश नव्हताच त्यांचा, शिवसेना हे नावच संपवायचं आहे. त्यासाठी शिवसेनेच्या अस्तनीतले निखारे त्यांनी ईडीच्या बळावर स्वतःकडे आणले. मुंबई महानगरपालिकेत भाजपाची चूल पेटवून झाली या निखाऱ्यांना पूर्णतः विझवून टाकेल.

संपूर्ण देशभर विध्वंसक राजकारण झालं तेव्हा महाराष्ट्रानं मध्यस्थी करून सुसंस्कृतपणा शिकवला आहे. वाईट प्रसंगी हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री गेलेला आहे पण तो स्वाभिमान न सोडता. आज सह्याद्री गुजरातचा दास झालेला आहे. वात शरीरातून कधी ना कधी निघून जातो पण जातांना शरीराची झीज करून जातो. भाजपाही एकदिवस सत्तेतून जाईल पण जातांना घटनात्मक संस्था आणि इथली उदार राजकारणाची परंपरा संपवूनच जाईल. आपल्याला आपला देश टिकवायचा असेल तर यांना सत्तेतून बाहेर काढणं हेच सध्याचं राष्ट्रीय कर्तव्य आहे.          

महेंद्र कुंभार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1